HW News Marathi
महाराष्ट्र

“शरजील या कारट्याला आमच्याकडे सोपवा”, नितेश राणेंचा संताप!

मुंबई | पुण्यातील एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेल्या विधानावरुन आता भाजपा नेते चांगलेच संतापले आहेत. शरजीलने केलेली अवमानजनक, आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्यांची तातडीने दखल घेऊन त्यावर राज्य सरकारतर्फे तातडीने आणि कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.

त्यानंतर, आता आमदार नितेश राणे यांनीही शरजीलला दाखवून देऊ, असा इशारा दिला आहे. भाजप नेते आक्रमक झाले आहेत. नितेश राणे यांनी ट्विट करुन, शरजील या कारट्याला आमच्याकडे सोपवा, एल्गार काय असतो ते दाखवून देऊ, असा दमच भरलाय.

काय केले होते शरजीलने वक्तव्य?

आज का हिन्दू समाज, हिंदुस्तान में हिंदू समाज बुरी तरीके से सड़ चुका है। ये जो लोग लिंचिंग करते हैं, कत्ल करते है, ये कत्ल करने के बाद अपने घर जाते है तो क्या करते होंगे अपने साथ? कोई नए तरीके से हात धोते होंगे, कुछ दवा मिलाकर नहाते होंगे। क्या करते है ये लोग की वापस आकर हमारे बीच खाना खाते है, उठते-बैठते है, फिल्में देखते है। अगले दिन फिर किसीको पकड़ते है फिर कत्ल करते और नॉर्मल लाईफ जीते है। अपने घर में मोहब्बत भी कर रहे है, अपने बाप का पैर भी छू रहे है, मंदिर में पूजा भी कर रहे है, फिर बाहर आकर यही करते है…’, वक्तव्य एल्गार परिषदेतील भाषणात शरजीलने केले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मेहबूब शेख यांच्या पाठीशी राष्ट्रवादीचे आमदार खंबीरपणे उभे राहिले 

News Desk

पटोलेंच्या स्वबळाच्या घोषणेनं शिवसेना-राष्ट्रवादीला कापरं भरलं, फडणवीसांचा टोला

News Desk

एनसीबीकडून आर्यन खानचं काऊन्सिलिंग; मलिक म्हणाले, व्हिडीओ रेकॉर्डिंग दाखवा…..

News Desk