HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेने सोबत जुळवून घेण्याच्या माहिती नंतर, शिवसेनेची प्रतिक्रिया

सिंधुदुर्ग | ठाकरे आणि राणे कुटुंब मध्ये नेहमीच मतभेद सुरु असतात. काही दिवसांपूर्वी भाजप आमदार नितेश राणे यांनी आधी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. शिवसेनेचे कार्यकर्ते या गोष्टीवरून आक्रमक पण झाले होते, त्यानंतर नितेश राणे यांनी दोघांची माफी सुद्धा मागितली. शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात बोलताना नितेश राणे यांनी राज्याच्या विकासासाठी आणि पक्षाच्या नेतृत्वाने आदेश दिल्यास खांद्याला खांदा लावून काम करण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान नितेश राणे यांच्या भूमिकेवर शिवसेनेने प्रतिक्रिया दिली आहे.

नितेश राणे यांनी आधी ठाकरे कुटुंबाबाबत केलेल्या वक्तव्यांप्रकरणी माफी मागावी

भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना आणि भाजप मध्ये पुन्हा युती होऊन मन लावून काम करू अशी इच्छा व्यक्त केली होती. सिंधुदूर्गमध्ये सागररत्न बाजपारपेठेचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी नितेश राणे बोलत होते. शिवसेनेचे नेते दीपक केसरकर, विनायक राऊतदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. दरम्यान नितेश राणे यांनी आधी ठाकरे कुटुंबाबाबत केलेल्या वक्तव्यांप्रकरणी माफी मागावी अशी मागणी दीपक केसरकर यांनी एबीपी माझाशी बोलताना केली आहे.

एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यास सगळे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करतील

भाजप शिवसेना हे समीकरण लोकांच्या चर्चेत असतंच . ‘काही दिवसांपूर्वी राज्यात युतीची चर्चा सुरू होती. त्यानंतर ती बंद झाली. मात्र आता भाजप, शिवसेनेचे नेते एकाच व्यासपीठावर आल्यानं युतीचे चाहते सुखावले असतील. आज रात्री त्यांना चांगली झोप लागेल,’ असं राणे म्हणाले. ‘कोकणच्या, राज्याच्या विकासासाठी पक्ष नेतृत्त्वानं एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यास सगळे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करतील,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेवर कायम टीका करणाऱ्या नितेश राणेंच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनाथांचा नाथ म्हणून पुढे या, कोरोनामुळे पालक गमावलेल्या 100 मुलांचं पालकत्व फडणवीसांनी स्वीकारलं

News Desk

या सरकारला आणखी अनेक राजीनामे घ्यावे लागतील, पंकजांचा अप्रत्यक्ष धनंजय मुंडेंना टोला

News Desk

काही जण पराभवाचे वर्ष साजरे करायलाच बीड मध्ये येतात, धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर हल्ला बोल

News Desk