HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईतील बेकायदेशीर शाळांवरून नितेश राणेंचा ठाकरे सरकारला सवाल

मुंबई | मुंबईत सुरू असलेल्या बेकायदेशीर शाळांविरोधात भाजप नेते नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईत २६९ बेकायदेशीर शाळा असल्याचा आरोप करून नितेश राणेंनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. तसेच हा काळाधंदा नेमका कुणाच्या आर्शिवादाने सुरू आहे? असा सवाल देखील यानिमित्ताने त्यांनी उपस्थित केला आहे.


नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी असं म्हंटलं आहे की, “आपल्या प्रगतशील महाराष्ट्रात शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मुलभूत अधिकार आहे. शाळेच्या गुणवत्तेवर आणि शिक्षणाचा दर्जावर राज्य सरकार व महापालिकेचं लक्ष असणं त्याचं योग्य नियमन करणं हे आपले कर्तव्य आहे. परंतु मुंबईत मात्र या शिक्षणाच्या नावाखाली प्रशासनाला हाताशी धरून टक्केवारीसाठी विद्यार्थ्यांच्या भविष्याचं वाट्टोळं करण्याचा जणू काही महापालिकेतील अधिकाऱ्यांनी विडाच उचलेला दिसतोय. मुंबई महापालिकेची मान्यता न घेता मुंबई तब्बल २६९ अनधिकृत शाळा सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा काळाधंदा नेमका कुणाच्या आर्शिवादाने सुरू आहे? याची माहिती पालकांना मिळाली पाहिजे”, असं राणे यांनी म्हंटलं. 

तसेच “या शाळाच जर बेकायदेशीर असतील या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पात्रातच धोक्यात येणार नाही का? दिखाव्यापुरते अनधिकृत शाळांना महापालिका नोटीसा बजावते मात्र सोयीस्कररित्या त्यांच्यावर दंडात्मक कारवाई राज्यसरकारकडून का टाळली जाते? एकीकडे आपण मुंबईतील महापालिकेच्या शाळांचे कौतुक करत आहात मात्र त्याच मुंबईत अनधिकृत शाळांचं रॅकेट गेल्या दहावर्षांपासून चालवलं जात आहे याचाच अर्थ अनधिकृत शाळांचे लागेबांधे व हितसंबंध प्रशासनातील अधिकाऱ्यांशी असणार हे स्पष्ट आहे”, असंही राणे म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर या गंभीर प्रश्नाकडे जातीने लक्ष द्यावं. संबंधित अधिकाऱ्यांवर व शाळांवर कठोर कारवाई करून या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी तातडीने उपाय योजना कराव्यात, अशी मागणी करत असे न झाल्यास आम्हाला विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी सरकारला दिला आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्तीसगडमधील सुकमा येथील चकमकीत ४ नक्षलवाद्यांना कंठस्नान

News Desk

“… साखर आयुक्तांनी आदेश मागं घ्यावा, अन्यथा संघर्ष अटळ”, राजू शेट्टींचा इशारा!

News Desk

वीज बचतीबाबत जागरूकता निर्माण करा! – उद्धव ठाकरे

Aprna