HW News Marathi
महाराष्ट्र

पर्यावरण मंत्र्यांची दिशा चुकली, मग आता वनमंत्री पूजा घालण्याच्या लायकीचे राहिले नाहीत, नितेश राणेंचा प्रहार  

मुंबई | बीडच्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेनेच्या मंत्र्यांचं नाव आल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. परळीत राहणाऱ्या या २२ वर्षीय तरूणीने पुण्यात आत्महत्या केली. यानंतर भाजपच्या महिला आघाडीने या प्रकरणात महाविकास आघाडीच्या मंत्र्यावर आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर सध्या या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे. तर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर होत असलेल्या आरोपांवर भाजप आमदार नितेश राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. नितेश राणेंनी ट्विट करत म्हटलंय की, या महाविकास आघाडी सरकारच्या दूरदृष्टीला सलाम, पर्यावरण मंत्र्यांची दिशा चुकली, मग आता वनमंत्री पूजा घालण्याच्या लायकीचे राहिले नाहीत. बाकी मंत्र्यांचे पण कहानी घर घर की चालू आहे, म्हणूनच जेल पर्यटन सुरू केले असावे. जनता मंत्र्यांना अजून कुठे भेटणार? असा चिमटा त्यांनी सत्ताधारी शिवसेनेला काढला आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकारनं जेल पर्यटन सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, त्यावरून नितेश राणेंनी हा टोला लगावला आहे.इतकचं नाही तर जे दिशा बरोबर झाले तेच पूजा बरोबर होणार असेल तर तो शक्ती कायदा काय चाटायचा आम्ही असा सवालही आमदार नितेश राणेंनी उपस्थित केला होता.

भाजपची मागणी राठोड यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी केली. राठोड यांना मंत्रिमंडळातून हटविले जात नसेल तर त्याचा अर्थ त्यांना मुख्यमंत्री संरक्षण देत आहेत असा होईल. पुरावे लक्षात घेता राठोड यांचा पूजा चव्हाण आत्महत्येची संबंध असल्याचे दिसते असे ते म्हणाले. त्यामुळे आता पुढे हे प्रकरण कोणत्या दिशेने जाणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. मुख्यमंत्री काय कारवाई करणार का हे ही पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नैतिकतेच्या मुद्दय़ावर राजीनामा देण्याची जबाबदारी फक्त शिवसेना, राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांवर आहे?

News Desk

आता जळगावमध्येही काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे खिंडार

News Desk

जावेद अख्तर यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा

News Desk