HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईतून बाप-बेट्याचं सरकार हद्दपार करायचंय, नितेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई | भाजप नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातून आई आणि मुलाचे सरकार हटवले. त्याचप्रमाणे आपल्याला मुंबईतून बाप-बेट्याचं सरकार हद्दपार करायचे आहे, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली. कोरोनाच्या काळात मुंबई महानगरपालिकेने केवळ मोठमोठी टेंडर मंजूर केली. प्रत्यक्षात मात्र काहीच घडले नाही. उद्धव ठाकरे आपण लोकप्रियतेच्याबाबतीत देशातील पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री असल्याचा दावा करत होते. पण कोरोनाच्या काळात ते घराबाहेर पडले नाहीत. अगदी दाऊदची धमकी आली तरी ते घरातच बसून राहिले, अशा शब्दांत नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडविली आहे.

भाजप आमदार सुनील राणे यांच्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आज (२५ ऑक्टोबर) बोरिवली येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नितेश राणे यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. नितेश यांनी आदित्य ठाकरे यांना बेबी पेंग्विन संबोधत त्यांची खिल्ली उडविली. तसेच मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेच्या कारभारावरही टीका केली. कोरोनाच्या काळात पालिकेने केवळ मोठमोठ्या रक्कमेची टेंडर मंजूर करवून घेतली. यानंतर प्रत्यक्षात काहीच घडले नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात मुंबईतून बाप-बेट्याचं सरकार हद्दपार झाले पाहिजे, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक होणारच,” अनिल देसाई यांची माहिती

Aprna

सरकारकडून शेतकऱ्यांना खुशखबर, २० एप्रिलपासून कापूस विक्री होणार सुरु

News Desk

फडणवीस सरकारचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प बळीराजासाठी समर्पित

News Desk