HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपचे केंद्रातील सरकार हे खरे सावकार आहेत – नितीन राऊत

मुंबई | महावितरणाची थकबाकी वाढण्यास कोरोनापेक्षाही भाजपची अकार्यक्षमता कारणीभूत असल्याची टीका राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे. भाजपची सत्ता असताना वीजबिल वसुली करण्यात अपयशी ठरलेल्या भाजपमुळेच महावितरण आर्थिक संकटात सापडली असल्याचे प्रत्युत्तर डॉ. राऊत यांनी दिले आहे. राज्याला कर्ज देताना बँकेपेक्षा जास्त व्याज दर आकारणारे भाजपचे केंद्रातील सरकार हे खरे सावकार आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.

भाजपची सत्ता राज्यात असताना 5 वर्षांत महावितरणची थकबाकी 37 हजार कोटींनी वाढली. त्या काळात ना कोरोना होता, ना आजच्यासारखे आर्थिक संकट तरीही वीजबिल ग्राहकांना विशेष सवलती देऊन थकित बिल वसूल का केले नाही, असा प्रश्न डॉ. राऊत यांनी विचारला आहे.

“राज्याच्या वीज क्षेत्रासाठी आम्ही आर्थिक अनुदान मागितले असता केंद्र सरकार आम्हाला कर्ज घ्या म्हणतेय. बँका 6 ते 7 टक्क्यांनी कर्ज देत असताना केंद्र सरकार मात्र 10.11 टक्क्यांनी कर्ज देऊ केले आहे. मग खरे सावकार तर भाजपचे केंद्रातील सरकार आहे असे म्हटले तर चुकीचे ठरेल का?, भाजपची सत्ता राज्यात असताना लातूर येथे नवे मीटर बसवून नंतर चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीरपणे वीजबिल वसुली करण्यात आली. ही सावकारी नव्हती का?,” असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गडकरींचा सल्ला राज्यातील 106 बेरोजगार, लवारीस ट्रोलर्स व त्यांच्या अहंकारी वाचाळविरांनी सुद्धा अंगीकारावा!

News Desk

भागवत करडांची यात्रा सर्वात आधी मुंडेंगडावरून!

News Desk

कट्टर शिवसैनिक ते मनसे जिल्हा प्रमुख प्रकाश कौडगे यांचे निधन

News Desk