HW News Marathi
महाराष्ट्र

मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गची जागा म्हणजे ‘नो-कॉस्ट’ नव्हे, तर ‘नो-मेट्रो’  

मुंबई | मेट्रोचे कारशेड आरेमधून कांजूरला हलवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे हा प्रकल्प तर लांबणारच शिवाय सरकारी तिजोरीवर ताणही येणार आहे असं माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. कारशेड कांजूरमार्ग येथे स्थानांतरित करुन मेट्रो ३ चे प्रश्न सुटणार नाहीतच शिवाय मेट्रो ३ आणि ६ अशा दोन्ही मेट्रोंच्या फेऱ्या मोठ्या प्रमाणात प्रभावित होणार आहेत. मेट्रो-६ च्या आरे ते कांजुरमार्ग या भागात विविध मार्गावरील मिश्र रेल्वे वाहतुकीमुळे मेट्रो-६ च्या कार्यान्वयनात तर प्रचंड गुंतागुंत निर्माण होईलच तसेच याचा मेट्रो-३ वरही परिणाम होईल. आणि या दोन्ही मेट्रोंच्या कार्यान्वयीन क्षमतेवर परिणाम होईल, शिवाय नुकसानही वाढेल.  मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गची जागा म्हणजे ‘नो-कॉस्ट’ नव्हे, तर ‘नो-मेट्रो’ प्रस्ताव असल्याची टीका देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे.

पर्यावरणासाठी संघर्ष करणार्‍यांचा मी सन्मानच करतो. पण आरे कारशेडची जागा ही कोणताच अन्य पर्याय शिल्लक न राहिल्याने निश्चित करण्यात आली होती. पण आता हेच पर्यावरणवादी मिठागाराच्या जागेवर, कांदळवन असलेल्या जागेवर, वन संरक्षित जागेवर कारशेडचे समर्थन करणार का?, असा सवालही देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला आहे. तर १ ऑक्टोबर २०२०ला मुंबई जिल्हाधिकार्‍यांनी कांजूरमार्गची जागा हस्तांतरित करताना ही अट स्पष्टपणे नमूद केली आहे की, या जागेशी संबंधित दावे प्रलंबित असल्यास त्यावरील खर्च हा ‘एमएमआरडीए’लाच सोसावा लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे म्हणतात, त्याप्रमाणे हा ‘नो-कॉस्ट’ नाही, तर ‘नो-मेट्रो’ प्रस्ताव आहे. टनेलची 76 टक्के कामे पूर्ण झाली, पण कार डेपो 4-5 वर्षं असणार नाही. या प्रकल्पाच्या आर्थिक व्यवहार्यतेची ही अखेर आहे. वाढीव किमतीचा भार शेवटी ग्राहकांच्या खिशातूनच वसूल होणार असल्याचंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या…राष्ट्रपती राजवट म्हणजे काय ?

News Desk

“राज्य सरकारने वेळकाढू धोरण न अवलंबता…” फडणवीसांचा ठाकरे सरकारला सल्ला

News Desk

‘राष्ट्रवादीने धनंजय मुंडें आणि अमोल कोल्हेंना प्रदेशाध्यक्ष का केलं नाही’, पडळकरांचा सवाल

News Desk