HW News Marathi
Covid-19

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत वीजबिल सवलतीबाबत कोणताही निर्णय नाही

मुंबई । राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील सर्वसामान्यांना वीजबिल सवलत मिळणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक झाले. उर्जामंत्र्यांच्या या विधानाने सर्वसामान्यांची कोंडी झालीच. मात्र, दुसरीकडे विरोधकांकडूनही महाविकासआघाडी सरकारवर मोठ्या प्रमाणत झाली. त्यामुळे, याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारच्या आजच्या (१९ नोव्हेंबर) मंत्रिमंडळ बैठकीत वाढीव वीजबिलाबाबत काहीतरी ठोस निर्णय होईल, अशी अपेक्षा सर्वांनाच होती. मात्र, या मंत्रिमंडळ बैठक वाढीव वीजबिलांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती मिळते.

ठाकरे सरकारकडून सर्वसामान्यांना वाढीव वीजबिलांतून काहीतरी दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, आजच्या बैठकीत सरकारकडून वीजबिलाच्या प्रश्नावरून कोणताही दिलासा देण्यात आलेला नसल्याने विरोधक आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. भाजप आणि मनसे या मुद्द्यावर एकत्र आले असून ठोस निर्णय झाला नाही तर महाविकासआघाडी सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे. सरकारकडून सर्वसामान्यांची फसवणूक झाल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.

मनसेचा इशारा

“वाढीव वीज बिलाबाबत सोमवारपर्यंत निर्णय घ्या. नाहीतर राज्यात उग्र आंदोलन करु”, असे अल्टिमेटम मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिला आहे. “वाढीव वीज बिलात सवलत दिली जाईल असं सरकारनेच सांगितलं होतं. मात्र, आता दिलासा देण्यास सरकारने नकार दिला आहे. ही जनतेची फसवणूक आहे. सरकारने आपला शब्द पाळावा,” असेही बाळा नांदगावकर म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई पोलिसांच्या नव्या आदेशात २ किलोमीटरच्या ‘लक्ष्मणरेषे’चा उल्लेख नाही

News Desk

राज्यात आज नवे  ४,९८१ रूग्ण आढळले

News Desk

साखर उद्योगातून ऑक्सिजन निर्मिती ! देशातील पहिल्या प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन

News Desk