HW News Marathi
महाराष्ट्र

एकही शाळा बंद करु देणार नाही, छात्र भारतीचा इशारा

मुंबई: राज्य सरकारने ८० हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून याला छात्र भारती आणि शिक्षक भारतीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवला तसेच हा आदेश काढण्याºया शिक्षण विभागाच्या सचिवाविरूद्ध कारवाईची मागणी करण्यासाठी मुंबईच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आज निदर्शने केली.

यावेळी शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे, प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे, कार्यवाह प्रकाश शेळके, मुंबई अध्यक्ष शशिकांत उतेकर, मच्छींद्र खरात, चंद्रकांत म्हात्रे, शिवाजी खैरमोडे, शिवाजी आव्हाड, छात्रभारतीचे मुंबई अध्यक्ष सचिन बनसोडे, सागर भालेराव, रोहित ढाले, विशाल कदम, सचिन काकड, भगवान बोयाळ, समिर कांबळे यांना मरीन लाईन्स पोलिसांनी ताब्यात घेतलं.उद्या राज्यातील सर्व शिक्षक सकाळी ११ वाजता घंटानाद करत काळ्या फिती लावून काम करतील अशी माहिती शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दारू पिऊन नदीत उतरलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

swarit

भाजपच्या  घोटाळेबाज मंत्र्यांना शिवसेनेने केले लक्ष 

News Desk

भाजपच्या माजी मंत्र्यांना मोठा धक्का, चुलत भावाचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश!

News Desk