HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात १ मे पासून लसीकरण होणार नाही, राजेश टोपेंचं मोठं विधान

मुंबई | राज्याला मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे १ पासून राज्यात लसीकरण सुरू होणार नाही, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. येत्या १ मेला सगळ्यांना सरसक लस देणं शक्य होणार नसल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (२८ एप्रिल) झाल्यानंतर राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. राज्यात सर्वांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र लगेच मोठ्या प्रमाणावर लस मिळणार नसल्याने राज्यात १ मेला रोजी लसीकरण होईलच असं नाही अशी शंका राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.

“१ मे ला राज्यात लसीकरण सुरू होणार नाही. आज लगेच आपल्याला लसीचे डोस उपलब्ध होणार नाहीत. मे अखेरपर्यंत जर लसीचे डोस उपलब्ध होणार असतील, तर त्यांना अचानक एकाच वेळी लसीचे डोस देता येणार नाहीत. त्यामुळे तरुणांना माझं नम्र आवाहन आहे की आपण सगळ्यांना मोफत लसीकरण करतो आहोत. पण आता समजुतदारीने काम घ्यावं लागणार आहे. नोंदणीसाठी कोविन अॅप वापरणं सक्तीचं आहे. त्यामुळे आधी नोंदणी करूनच नोंदणी केंद्रावर जाता येणार आहे. कुणीही थेट केंद्रावर जाऊन लसीची मागणी करू नये. केंद्र सरकारने नोंदणी बंधनकारक केली आहे”, असं यावेळी राजेश टोपे म्हणाले.

“वर्गवारीनुसार लसीकरणावर विचार सुरू”

“आपल्याला इच्छा असूनसुद्धा लसी उपलब्ध होत नसल्यामुळे १ मे ला लसीकरण सुरू करता येणार नाहीये. पण आपण यावर काम करत आहोत. ५ कोटी ७१ लाख लोकांना लसीकरण करायचं आहे. त्यासाठी वरीष्ठ मंत्र्यांची एक समिती याचं सूक्ष्म नियोजन करत आहे. १८ ते २५, २५ ते ३५ आणि ३५ ते ४४ अशा वर्गवारीवर काम सुरू आहे. ३५ ते ४४ हा गट आधी घेता येईल का? याची चाचपणी सुरू आहे. यातले सहव्याधीचे रुग्ण आधी घेता येतील का? यावर देखील विचार सुरू आहे. १८ ते ४४ वयोगटासाठीचे लसीकरण केंद्र वेगळे असतील आणि ४५ वयोगटाच्या पुढचे केंद्र वेगळे असतील”, अशी देखील माहिती राजेश टोपे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली.

“तरुणांनी अतीउत्साहात केंद्रांवर गर्दी करू नये”

“लस उत्पादकांना केंद्र सरकारला एकूण उत्पादनातले ५० टक्के लसीचे डोस द्यावे लागणार आहेत. तर ५० टक्के लसीचे डोस राज्य सरकार आणि खुल्या बाजारात विक्रीसाठी देण्यास सांगितले आहेत. त्यामुळे आपल्याला लसीच्या डोसच्या उपलब्धतेचं मोठं आव्हान असणार आहे. केंद्रांवर गर्दी न करता आणि हे केंद्र करोना पसरवणारे केंद्र होऊ नये याची काळजी घ्यावी लागणार आहे. तरुण अतीउत्साहाने तिथे जाऊ शकेल. त्यामुळे येत्या ६ महिन्यांत लसीकरण पूर्ण करायचं आहे. पण ते सबुरीने करावं लागणार आहे. घाईगडबड न करता राज्य स्तरावरचा चांगला कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याचं आवाहन माझं राज्यातल्या जनतेला आहे”, असं आवाहन राजेश टोपे यांनी यावेळी केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आदर्श सरपंच असलेल्या भास्कर पेरे पाटलांचा पराभव तर हिवरे बाजारमध्ये ३० वर्षांनी झाली निवडणुक

News Desk

पुण्यातील व्यापाऱ्याला जीएसटी चुकविल्याप्रकरणी अटक

News Desk

भाजपच्या बॅनरला शिवसेनेकडून बॅनरनेच उत्तर!

News Desk