HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेस, राष्ट्रवादीमधील नेत्यांच्या साखर कारखान्यांना नोटिसा

मुंबई | राज्यातल्या सोलापूर, वर्धा, नाशिक, बुलडाणा व उस्मानाबाद या पाच जिल्हा सहकारी बँकांनी आघाडी सरकारच्या काळात ११ सहकारी साखर कारखान्यांना सरकारी हमीवर कर्ज वितरण केले होते. सोलापूर, वर्धा, नाशिक, बुलडाणा व उस्मानाबाद या पाच जिल्हा सहकारी बँकांनी आघाडी सरकारच्या काळात ११ सहकारी साखर कारखान्यांना सरकारी हमीवर कर्ज वितरण केले होते. राज्यातील पाच जिल्हासहकारी बँकांचे तब्बल १२२३.९३ कोटी रुपयांचे कर्ज थकविल्यामुळे राज्य सरकारने ११ मोठ्या साखर कारखान्यांना नोटीसा बजावल्या आहेत.

ज्या सारख कारखान्यांना नोटीस बजाविण्यात आल्या आहेत हे सर्व साखर कारखाने काँग्रेस मधील व राष्ट्रवादीच्या मातब्बर नेत्यांचे आहेत. पण या कारखान्यांनी कर्जाची परतफेड केलेली नाही. त्यामुळे या बँकांची रोख तरलता संकटात आली आहे. त्यामुळे कर्जवसुलीसाठी वित्त विभागाने सहकार विभागाच्या मार्फत या कारखान्यांना नोटिसा बजावल्या आहेत. सहकार क्षेत्रात जनतेच्या पैशाची कशी लूट केली जात आहे, हे सर्वांसमोर यावे यासाठी सहकार क्षेत्रावर लवकरच ‘श्वेत पत्रिका’ काढण्यात येणार आहे, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील जाहीर केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचे खासदार सायकलवरून संसदेत जायचे, ते तुम्ही विसरालात?, मलिकांनी फडणवीसांना डिवचले

News Desk

मी संपले असते तर मला संपवायचे प्रयत्नही संपले असते!

News Desk

ॲट्रॉसिटी ॲक्टला कमकुवत करणाऱ्या परिपत्रकाची अंमलबजावणी होणार नाही! – सिद्धार्थ हत्तिअंबिरे

Aprna