HW News Marathi
महाराष्ट्र

आता ‘मराठा क्रांती ठोक मोर्चा’ विधानसभा लढविणार

मुंबई | ‘मराठा क्रांती ठोक मोर्चा’चे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपले उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर केले आहे. मराठा समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी मराठा समाजाचाच प्रतिनिधी सभागृहात पाठवण्यासाठी आपण ही निवडणूक लढवणार असल्याचे देखील आबासाहेब पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने २७ जून रोजी मराठा आरक्षण वैधच असल्याचे म्हणत मराठा समाजाला नोकरीत १२ टक्के तर शिक्षणात १३ टक्क्यांपर्यंत आरक्षण देण्याचा निर्णय दिला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर मराठा समाजात अत्यंत आनंदाचे वातावरण होते.

मराठाच्या समाजाला आरक्षण मिळाले असले तरीही आमच्या अनेक मागण्या अद्याप राज्य सरकारने प्रलंबित ठेवल्याचा आरोप मराठा समाजाकडून करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, मराठा समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी सभागृहात कोणीही पुढाकार घेत नाही. त्यामुळे, आता सभागृहात मराठा समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी मराठा समाजाचाच प्रतिनिधी हवा यासाठी आपण ही निवडणूक लढविणार असल्याचे मराठा समाजाकडून सांगण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापूरचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन!

News Desk

दुधाचे दर वाढण्याची शक्यता

News Desk

उन्हाळ्यात गोवा-कोकणात जाणार रेल्वेच्या जादा गाड्या

News Desk