HW News Marathi
Covid-19

मुंबईत कोरोना चाचण्यांची संख्या 50 टक्क्यांहून कमी, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई | “राज्यात एकूण चाचण्यांची संख्या कायम ठेवताना मुंबईतील चाचण्यांची संख्या मात्र 50 टक्क्यांहून अधिक संख्येने कमी करण्यात आल्या आहेत आणि आता राज्यात कोरोनाबळींची संख्या झपाट्याने वाढत आहे”, याबाबत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आज (४ जून) एक पत्र लिहून लक्ष वेधले आहे. मुंबईत मृत्यू प्रमाणपत्रात नैसर्गिक मृत्यू किंवा अन्य कारणे देण्यात येत असल्याच्या प्रकाराकडेही फडणवीसांनी या पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात, “१ मे रोजी महाराष्ट्रातील एकूण चाचण्यांमध्ये मुंबईतील चाचण्यांचे प्रमाण हे ५६% होते. याचा अर्थ अर्ध्याहून अधिक चाचण्या या कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या मुंबईत होत होत्या. १५ मे रोजी हे प्रमाण ४०.५ टक्क्यांवर आणण्यात आले आणि आता ३१ मे रोजीची आकडेवारी पाहिली तर एकूण महाराष्ट्रातील चाचण्यांच्या तुलनेत मुंबईतील चाचण्यांचे प्रमाण हे २७ टक्क्यांवर आले आहे. म्हणजेच पूर्वी होणार्‍या चाचण्यांपैकी ५० टक्क्यांहून कमी. कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या मुंबईत चाचण्यांची कमी होणारी संख्या ही निश्चितच चिंताजनक बाब आहे.”

पुढे देवेंद्र फडणवीस या पत्रात असेही म्हणतात कि, “एकिकडे चाचण्यांची संख्या कमी होत असताना दुसरीकडे कोरोनाबळींच्या संख्येने नवीन उच्चांक गाठले जात आहेत. २७ मे रोजी त्या कालखंडापर्यंतच्या सर्वाधिक १०५ बळींची नोंद झाली होती. २९ मे रोजी ही संख्या ११६ वर पोहोचली आणि काल म्हणजेच बुधवारी ३ जून रोजी तर १२२ बळी असा नवीन उच्चांक स्थापित झाला आहे. मुंबईच्या बाबतीत विचार केला तर आतापर्यंतचे सर्वाधिक ६४ बळी ३० मे रोजी गेले आहेत. गेल्या २ दिवसांपासून प्रत्येकी ४९ बळी एकट्या मुंबईत आहेत.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिवासीय भारतीयांनी महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत सहभाग घ्यावा !

News Desk

ट्रम्प यांचा भारताला इशारा ,मदत करा नाहीतर ..

Arati More

नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र पुर्णपणे अनलॅाक होणार,राजेश टोपेंचे संकेत !

News Desk