HW News Marathi
महाराष्ट्र

अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला असता तर तिला न्याय मिळाला असता

मुंबई | दलितांवर होणाऱ्या अन्यायाचे कधीच प्रकाशात न आलेले उदाहरण म्हणजे 2015 साली घाटकोपर भटवाडी येथे झालेले गुडीया बलात्कार करुन निर्घुण हत्या प्रकरण. आजही विचार केला तर मन हेलावून टाकणारी ही घटना केवळ अडीच वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर 2015 साली बलात्कार झाला.

घरातून गोळ्या आणायला गेलेली गुडीया दोन दिवस परतली नाही. दोन दिवसांनी गोणीत भरलेला गुडीयाचा मृतदेह आई वडिलांना परिसरात डोंगरावर असलेल्या पाण्याच्या टाकीवर आढळला. मुलीचा मृतदेह पहाताच तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे आई वडिलांच्या लक्षात आले परंतु संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी या संदर्भात कोणतीही गुन्हा दाखल केला नाही.

बलात्कार आणि हत्या प्रकरणात नीट नोंद न केल्यामुळे 2015 ला बलात्कार झाल्यानंतर प्राण गमावलेली चिमुकली गुडीया आजही न्यायापासून वंचित राहिली आहे. आज या घटनेला जवळपास 3 वर्षे होत आहेत. परंतु या घटनेचा नीट अभ्यास केल्यानंतर समोर आलेली बाब अत्यंत धक्कादायक आहे. गुडीयावर आलेल्या अत्याचाराची विस्तृत नोंद न करण्याचे कारण म्हणजे गुडीया ही दलित समाजातली लेक होती. 2015 साली जेव्हा गुडीयावर बलात्कार करून हत्या केलेली नोंद अट्रोसिटी अंतर्गत झाली असती तर कदाचित आतापर्यंत त्या चिमुकली ला न्याय नक्कीच मिळाला असता यात शंका नाही.

गुडीया ही गरीब घरची मुलगी असल्यामुळे हे प्रकरण पोलीस दरबारी देखील दडपले गेले. कुणीच या बाबत ठोस पाऊल उचलले नाही त्यामुळे कुठेतरी गुडीयाच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणावर पोलिसांनी पडदा टाकल्याचे पहायला मिळते. केस नोंदणीपासून ते तपास करण्यापर्यंत अनेक ठिकाणी पोलिसांचा हलगर्जीपणा पहायला मिळतो. सुरुवातीला पीडित मुलीच्या आई वडिलांना पोस्टमार्टम आणि एफ आय आरच्या कॉपी ते अडाणी असल्याची सबब देत दिल्या जात नाहीत. बाहेर परिसरात गुन्हेगाराचा शोध न घेता मुलीच्या वडिलांना बोलवून अनेकदा चौकशी केली जाते. एफ आय आर वर जातीची नोंद केली जात नाही या आणि अशा अनेक कारणांमुळे या केस बाबत पोलिसांना स्वारस्य नसल्याचे दिसून येते.

या प्रकरणात जितके गुन्हेगार दोषी आहेत तितकेच पोलीस देखील दोषी असल्याचे दिसून येते. पोलिसांनी मुलीच्या आई वडिलांनी मागणी केल्यानंतर चौकशीला गती दिली असती तर आतापर्यंत नक्कीच गुडीयाचा मारेकरी पोलिसांच्या हाती लागला असता. अनेकदा पाठीमागे लागूनही जेव्हा पोलीस मदत करत नाहीत हे लक्षात आल्यानंतर आपल्याला न्याय मिळेल ही आशा सोडून गुडीयाच्या आई वडिलांनी तूर्तास गुडीयाला न्याय मिळेल अशी अशाच सोडली आहे.आजही अट्रोसिटी अंतर्गत पीडित मुलगी दलित असल्यामुळे केस पुन्हा ओपन झाल्यास विशेष चौकशी सुरू करून संबंधित पोलिसांनी निलंबित केल्यास या प्रकरणी पीडित मुलीच्या आई वडिलांना न्याय मिळेल इतके नक्की.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तुम्ही आमचा अपमान करत आहात”, संजय राऊतांचा राज्यपालांच्या भूमिकेवर आक्षेप!

News Desk

‘…ही ‘हेराफेरी ४’ साठी परफेक्ट स्क्रिप्ट, त्यात नवाबला ‘बाबूभाई’चा रोल द्या’, नितेश राणेंचा टोला

News Desk

मागच्या 5 वर्षांमध्ये भोंगे नव्हते का आणि तेव्हा अजान होत नव्हते का?, भाई जगतापांचा राज ठाकरेंना सवाल

Aprna