HW News Marathi
महाराष्ट्र

कुप्रथा बंदचा ठराव करून ग्रामपंचायतींनी विधवा महिलांचे जीवन सुकर करावे! – हसन मुश्रीफ

मुंबई । समाजात प्रचलित असलेली अनिष्ट प्रथा बंद करण्याचा ठराव ग्रामसभेमध्ये ठेऊन कोल्हापूर जिल्ह्याच्या हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद केली. आता अन्य ग्रामपंचायतींना प्रोत्साहीत करणे आवश्यक आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये प्रागतिक विचारांचे स्वागत होणे महत्त्वाचे आहे. जुन्या बुरसटलेल्या प्रथा परंपरांना विज्ञानवादी युगामध्ये स्थान असता कामा नये, असे सांगून हेरवाड ग्रामपंचायतीप्रमाणे राज्यातील अन्य ग्रामपंचायतींनी याचे अनुकरण करून ठराव करण्याचे आवाहन ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

कोल्हापूर जिल्ह्याच्या हेरवाड ग्रामपंचायतीने 5 मे 2022 रोजी विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर केला. या ग्रामपंचायतीने केलेली ही कृती स्तुत्य असल्याने या ग्रामपंचायतीचे मंत्री मुश्रीफ यांनी अभिनंदन केले. काल कुप्रथांचे पालन होत असल्याने अशा व्यक्तीच्या प्रतिष्ठेचे, जीवन जगण्याच्या मानवी अधिकारांचे तसेच भारतीय संविधानाने बहाल केलेल्या समतेच्या हक्काचेही उल्लंघन होते. त्यामुळे अशा प्रथेचे निर्मुलन होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे हेरवाड ग्रामपंचायतीने केलेल्या ठरावाप्रमाणेच अन्य ग्रामपंचायतींनी या निर्णयास आदर्श मानून समाजातील कुप्रथा बंद करून महिलांचे जीवन सुकर आणि आनंदी करण्याचे समाजोपयोगी निर्णय घ्यावेत, असेही आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले. या संदर्भातील परिपत्रक ग्रामविकास विभागाने निर्गमित केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाची जोखीम कमी करण्यासाठी लसीकरण अत्यावश्यक! – छगन भुजबळ

Aprna

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण | तिन्ही महिला आरोपींना ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी

News Desk

ऑनलाईन शाळा सुरु असल्या तरीही विद्यार्थ्यांना दिवाळीची सु्ट्टी मिळणार – वर्षा गायकवाड

News Desk