HW News Marathi
महाराष्ट्र

जंजिरा किल्ल्यावर 365 दिवस तिरंगा फडकणार ?

मुंबई | जंजिरा किल्ल्यावर आतापर्यंत केवळ 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनी आणि 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनी तिरंगा फडकावण्यात येत होता. मात्र सह्याद्री प्रतिष्ठानने केलेल्या पाठपुराव्यानंतर आता 365 दिवस कायम तिरंगा ध्वज फडकवण्याची परवानगी केंद्र शासनाने दिली आहे. यासंदर्भात सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विनोद पोखरकर यांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्रव्यवहार केला होता. त्याची दखल घेत केंद्र शासनाने हे आदेश दिले आहेत.

तिरंग्याचा मान राखत तो फडकवण्यात यावा, असे आदेश केंद्र शासनाकडून देण्यात आले आहेत. लवकरच या संदर्भातील तारीखही जाहीर केली जाणार आहे. सह्याद्री प्रतिष्ठानने केलेल्या पाठपुराव्यानंतर केंद्र शासनाने हे आदेश दिल्याची माहिती संस्थेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विनोद पोखरकर यांनी दिली आहे. याआधी 100 हून अधिक किल्ल्यांवर एकाच दिवशी भगवा ध्वज फडकावण्याची किमया सह्याद्री प्रतिष्ठानने केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर घाटकोपरमध्ये मनसेकडून स्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्यास सुरुवात

Aprna

“आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गोंधळाला ‘भ्रष्टाचारी‘ महाविकास आघाडी सरकारच जबाबदार” – अतुल भातखळकर

News Desk

इव्हीएम हॅकचे निवडणूक आयोगाचा दावा फोल

News Desk