HW News Marathi
Covid-19

२२ मे रोजी भाजपचे राज्यातील ठाकरे सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन

मुंबई | संपूर्ण देशात कोरोनामुळे स्थिती चिंताजनक आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाखाच्या पार गेल्यानंतर चिंता आणखी वाढली आहे. त्यातच संपूर्ण देशात महाराष्ट्रात आणि मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र-राज्य दोन्ही सरकारे प्रयत्नशील आहेत. मात्र, आता राज्यामध्ये विरोधी पक्ष सरकारविरोधात आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजप येत्या २२ मे रोजी राज्यातील महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात राज्यव्यापी ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन छेडणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वतः आज (२० मे) एका व्हिडीओमार्फत ही माहिती दिली आहे. #माझंआंगणरणांगण #MaharashtraBachao असे हॅशटॅग्स देखील भाजपकडून वापरण्यात येत आहेत.

“महाराष्ट्रात ९ मार्च कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला तर त्याच दिवशी केरळमध्ये देखील कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. मात्र, त्यानंतर ७० दिवसांत केरळमधील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 1 हजारच्या पार गेला नाही. तर दुसरीकडे महाराष्ट्रात गेल्या ७० दिवसांत कोरोनाबाधितांचा आकडा ४० हजारच्या दिशेने चालली आहे. केरळमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या १२ पार झालेली नाही. पण महाराष्ट्रातल मृत्यूची संख्या १३०० पार होऊन १४०० कडे निघाली आहे. आरोग्यव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. हे संपूर्णपणे महाराष्ट्रातील ठाकरे सरकार अपयशी झाल्याचे उदाहरण आहे”, अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली. “गेल्या ७० दिवसांत सरकारकडून वारंवार सांगण्यात आले कि संकट खूप मोठे आहे, सहकार्य केले पाहिजे. म्हणून राज्यातील जनतेने, आणि विरोधी पक्षाने संयम ठेवला. मात्र, आता लोक आपल्या मनातील राग लपवू शकत नाहीत”, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यापुढे बोलताना असे म्हणाले कि, “भाजपच्या या महाराष्ट्र बचाव आंदोलनात सहभागी होत राज्यातील जनतेने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत राज्य सरकारचा निषेध करायचा आहे. हा निःशेष नोंदवण्यासाठी २२ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत राज्यातील लोकांनी आपल्या घराबाहेर येऊन काळे मास्क, काळे शर्ट, काळी रीबीन, काळे बोर्ड दाखवून राज्य सरकारप्रति आपला निषेध व्यक्त करायचा आहे “, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. भाजप कायमच विरोधी पक्ष आपली भूमिका बजावत राहील. म्हणूनच काल (19 मे) आम्ही राज्यातील सर्व तहसीलदार आणि कलेक्टर यांच्या कार्यालयात निवेदन देण्याचे काम केले”, असेही चंद्रकांत पाटलांनी सांगितले. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याला मोठा दिलासा ! कोरोनाबाधितांचा आकडा ४० हजारांहून कमी, तर कोरोनमुक्त ६० हजारांच्या पार 

News Desk

शिवसेना अन् अयोध्येचे पूर्वापारचे नाते, पक्षप्रमुखांना निमंत्रणाची आवश्यकताच नाही !

News Desk

लसीकरण मोहीम पूर्ण होईपर्यंत महाविद्यालय सुरू करणे अशक्य- उदय सामंत

News Desk