HW News Marathi
महाराष्ट्र

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार अन् फडणवीसांमध्ये जुंपली

मुंबई । राज्याच्या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून या अधिवेशनात कोणकोणते मुद्दे गाजणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. दरम्यान, आज (१ मार्च) या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात मराठवाडा, विदर्भ वैधानिक विकास मंडळ आणि राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्यावरून चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले आहे.

सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यापासूनच विरोधक आक्रमक पवित्र्यात होते. कामकाज सुरू होताच अजित पवार यांनी पुरवणी मागण्या सभागृहात मांडायला सुरुवात केल्यावर विरोधकांनी बाकांवर उभे राहत घोषणाबाजी करायला सुरुवात केली. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार देखील यावेळी प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. “समतोल विकासाचा विचार करुन या सरकारने निधीचे वाटप केले आहे का? मराठवाडा, विदर्भ या राज्याचा भाग आहे. कोणत्याही डावपेचाला वैधानिक विकास मंडळे बळी पडता कामा नयेत.”

अजित पवारांना आपल्याच आश्वासनांची आठवण करून देत सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “अजित पवारांनी १५ डिसेंबर २०२० ला आश्वासन दिले होते की, आम्ही वैधानिक विकास मंडळे स्थापन करुन देऊ. त्याला आता ७२ दिवस झाले आहेत. अजित पवार तुम्ही तुमचा शब्द पूर्ण करणार आहात की नाही ते सांगा.”

तर याच मुद्द्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “जे अजित पवारांच्या मनात होते तेच ओठी आले आहे. १२ आमदारांच्या नावाखाली विकास मंडळे ओलीस ठेवली जात आहे. राज्यपाल कोणत्या पक्षाचे नसून राज्याचे आहेत. त्यामुळे, तुम्ही अशी भाषा वापरु नका, जनता माफ करणार नाही. आम्ही जे आमच्या हक्काचे आहे तेच मागतोय. भीक मागत नाही. संविधानाने आम्हाला जो अधिकार दिला आहे तो आम्ही मिळवणारच”, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. फडणवीसांच्या या टिकेवर बोलताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा आश्वासन दिले आहे की, “अर्थसंकल्प जेव्हा सादर केला जाईल तेव्हा विकास मंडळांची घोषणा केली जाईल.”

फडणवीस का संतापले ? अजित पवार काय म्हणाले ?

अजित पवार यांनी याबाबत बोलताना म्हणाले कि, “आमचे सरकार हे विदर्भ मराठवाडा विकास मंडळ झाले पाहिजे याच मताचे आहे. विकास मंडळांबद्दल आमचे काय ठरले आहे ? ते ८ तारखेला जाहीर होणाऱ्या बजेटमध्ये समजले आहे. आम्ही लवकरात लवकर पावले उचलू. ज्या दिवशी राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या १२ सदस्यांची नावे जाहीर होतील त्याचवेळी विकास मंडळे घोषित होती”, असे पवार म्हणाले. अजित पवारांच्या या विधानावर फडणवीस संतापले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औरंगाबादमध्ये कोरोनाचा पहिला बळी, तर सात वर्षाची मुलगी पॉझिटिव्ह

News Desk

पंतप्रधानही संसदेत नसतात त्यांचा चार्जही दुसऱ्याकडे द्या ! – नाना पटोले

Aprna

“मंदिरं उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो”, तुषार भोसलेंची ठाकरे सरकारवर टीका

News Desk