HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंविरोधात उत्तरप्रदेशमध्ये ऑनलाईन तक्रार दाखल!

मुंबई। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात उत्तर प्रदेशमध्ये ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे. 2018 साली उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याच कारणामुळे ठाकरे यांच्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. 2018 साली निवडणुकीदरम्यान मे महिन्यात उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांना चपलेने मारण्याची भाषा केली होती. पोलिसांनी ठाकरेंविरोधात एफआरआय दाखल करावा अशी मागणी उत्तर प्रदेशच्या भाजप कार्यकर्त्यांनी केली होती.

विरोधकांकडून उद्धव ठाकरेंची कोंडी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक आणि जामीन प्रकरणानंतर आता भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात येत आहे. राज्यात यवतमाळनंतर आता नाशिकमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार अर्ज देण्यात आले आहेत. नाशिकमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी हे तक्रार अर्ज पोलीस आयुक्त कार्यालय, सायबर पोलीस ठाणे, सरकारवाडा पोलीस ठाण्यात हे तक्रार अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यातील दोन तक्रार अर्ज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तर एक तक्रार अर्ज सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांच्याविरोधात करण्यात आला आहे.

दीपक पांडे यांनी लवकरात लवकर गुन्हे दाखल करावे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दाखल करण्यात आलेल्या तक्रार अर्जात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल केलेलं आक्षेपार्ह विधान आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांचं कौतुक केल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. तर सामना अग्रलेखात नारायण राणे यांच्यावर खालच्या भाषेत टीका करुन नाशिकमध्ये पोस्टर झळकावल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खालच्या भाषेत टीका केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी, पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी लवकरात लवकर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केलीय. यात आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य

शिवरायांना राज्याभिषेक करताना तिथून इथे गागाभट्ट आले होते. उत्तर प्रदेशातून गागाभट्ट आले होते. त्यांनी किती सन्मानाने शिवरायाला राज्याभिषेक केला. आणि हा योगी आला.. अशी टरटरुन..कसलं काय नसलं की… म्हणजे गॅसचा फुगा असतो ना, काही नसतं गॅस असतो, पण हवेत उडत असतो, तसा हा गॅसचा फुगा आहे. आला तो सरळ चपला घालून महाराजांना हार घालायला गेला.. सरळ चपला घालून.. असं वाटलं त्याच चपला घ्याव्या आणि त्याचं थोबाड फोडावं… लायकी तरी आहे का तुझी महाराजांच्या पुतळ्यासमोर राहण्याची…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंबाबाई… कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे – अजित पवार

News Desk

मराठा आरक्षणावरुन धनगर समाज आक्रमक, लवकर निर्णय घ्या अन्यथा संघर्ष अटळ!

News Desk

शेतक-यांना वा-यावर सोडून सरकारने इनोव्हेह कंपनीला 100 कोटी रु दिले ,धनंजय मुंडे यांचा आरोप

swarit