HW News Marathi
महाराष्ट्र

…भोंग्यांवर कारवाई करण्यांची हिम्मत नाही, नारायण राणेंचा राज्य सरकारला टोला

मुंबई | “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मेपर्यंत मशिदीवरील भोंगे हटवण्याच्या भूमिकेला केंद्रीय मंत्री नारायण राणे समर्थन दिले आहे. फक्त आमचे घर अनधिकृत यांना दिसते, मात्र भोंग्यांवर कारवाई करण्याची यांची हिम्मत नाही,” अशी टीका नारायण राणेंनी महाविकासआघाडी सरकारवर केली आहे. नारायण राणेंच्या जुहूच्या अधिश बंगल्यामधील बांधकाम नियमिततेचा अर्ज मुंबई महापालिकेने नामंजूर केला असून राणेंना त्यांच्या बंगल्यासंदर्भातील सर्व योग्य कागदपत्रे पुन्हा सादर करण्यासाठई १५ दिवसांती अंतिम मुदत देण्यात आली आहे. यामुळे आता १५ दिवसानंतर राणेंच्या बंगल्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

“माझ्या निवसस्थानाला सर्व अधिकृत परवानगी मिळाल्यानंतर तेव्हाच मी गृहप्रवेश करेन. माझ्या बंगल्यात बेकायदेशीर असे काहीच नव्हते. तरी देकील पालिकेने माझ्या बंगल्याला नको ते कारण देऊन त्यांनी नोटीस पाठवली. परंतु, हे सूडबुद्धीने केलेले राजकारण असून ही कायदेशीर कारवाई नाही. पालिकेला फक्त माझेच घर दिसते. इतर ठिकाणी फिरताना ते डोळे झाकून फिरतात. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देखील सूडबुद्धीच्या भावनेने कारवाई करत आहे. परंतु, देशात लोकशाही आणि माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे,” असे नारायण राणेंनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यातील कंपनीला लागलेल्या आगीतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत करणार – अजित पवार

News Desk

विधानभवनासमोर कांदा फेक आंदोलन

News Desk

विलासराव नावाचं विद्यापीठ 

News Desk