HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकास आघाडीकडून फडणवीस सरकारच्या वृक्ष लागवडीच्या चौकशीचे आदेश

मुंबई | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात ३३ कोटी वृक्षांची लागवड केल्याचा दावा तत्कालीन सरकारने केला होता. या वृक्ष लागवडीच्या अभियानासाठी वर्षाकाठी साधारण १ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. वृक्ष लागवडीमध्ये घोटाळा झाल्याचे आरोप महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांनी केला असून या प्रकरणाची चौकशी करण्याचे तसे पत्रेही वनमंत्री संजय राठोड यांना लिहिले होते. त्यानुसार राठोड यांनी वृक्ष लागवडीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

वनमंत्र्यांच्या आदेशानुसार वन विभागाचे प्रधान सचिव येत्या आठवड्यात नागपुरला जाणार असून गेल्या पाच वर्षांत किती वृक्ष लावण्यात आले आहे. यात किती वृक्ष जगले, लागवड करण्यात आलेल्या वृक्षांपैकी किती देशी होते, किती परदेशी होते, याची चौकशी प्रधान सचिवांकडून करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. फडणवीस सरकारच्या काळात वृक्ष लागवडीच्या अभियान राबविण्यात आले. त्यावेळी सुधीर मुनगंटीवार वनमंत्री होते.

या प्रकरणाच्या चौकशीवर मुनगंटीवारांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले की, “वृक्षलागवडीची चौकशी करायला काही हरकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. माजी न्यायाधीशांच्या नेतृत्त्वात चौकशी समितीच नेमा. तसंच राज्यातील शंकाखोरांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी श्वेतपत्रिकाही काढा, अशा आशयाचे लेखी पत्र स्वत: देणार आहे, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. ३३ कोटी वृक्ष लागवड हे ईश्वरीय-पर्यावरण कार्य आहे. याच मोहीमेमुळे राज्यातील वनेतर क्षेत्रात जंगल वाढल्याची नोंद केंद्रीय वनसर्वेक्षण विभागाने केली, असेही मुनगंटीवार यांनी लक्षात आणून दिले. तसेच ही वृक्ष लागवड वनविभागाने नव्हे तर ३२ विभागांनी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी मिळून केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हळूहळू संजय राऊत खरं बोलायला लागलेत पण…”, आशिष शेलारांचा टोला

News Desk

मराठा आरक्षणावरुन धनगर समाज आक्रमक, लवकर निर्णय घ्या अन्यथा संघर्ष अटळ!

News Desk

गावी जाण्याची सोय होईपर्यंत विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याची सक्ती नाही

swarit