HW News Marathi
महाराष्ट्र

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांसह विखे पाटलांसमोर घोषणाबाजी

मुंबई | राज्याच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून (१७ जून) सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवनात दाखल होताच विरोधकांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. “विकासाची सगळी स्वंप्ने भंग, सरकार मात्र विस्तारात दंग…!”, “जय श्री राम…आयाराम…गयाराम…!”, अशा घोषणांनी विरोधकांनी विधानभवनाचा परिसर दणाणून टाकला. हे अधिवेशन फडणवीस सरकारच्या यंदाचे टर्मचे शेवटचे अधिवेशन आहे.

मुख्यमंत्र्यांकडून विधानसभेत नव्या मंत्र्यांची ओळख करून दिली. या अधिवेशनात २८ विधयकांवर चर्चा होणार आहे. तर दुष्काळी उपयोजनांवर होणार आहे. काँग्रेसला जय महाराष्ट्र करून नुकतेच भाजपमध्ये सामील झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांना काल (१७ जून) नव्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात कॅबिनेटमध्ये गृहनिर्माण खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच विखे पाटील यांच्यासमोर विरोधकांनी घोषणा देण्यास सुरुवात केले होते.

शेतकरी, बेरोजगारी, दुष्काळ अशा विविध मुद्द्यांवरुन विरोधक आक्रमक भूमिका घेत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक खात्यांमध्ये फेरबदल करण्यात आल्याने विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी नव्या मंत्र्यांची दमछाक होताना पाहायला मिळू शकते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इम्तियाज जलील यांनी लॉकडाऊन रद्द होताच केला जल्लोष, कोरोनाचे मोडले नियम

News Desk

ठाकरे सरकार कोसळणार अशा पैजा लागल्या होत्या मात्र सरकार ताकदीने चालतयं!

News Desk

बीडमधील ‘त्या’ चार बालकांच्या मृत्यू प्रकरणी अखेर चार वाळूमाफियांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल!

News Desk