HW News Marathi
महाराष्ट्र

बारवी धरणप्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या देण्याचे आदेश महापालिकांना एप्रिल अखेरची मुदत

मुंबई | बारवी धरण प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या देण्याची जबाबदारी या क्षेत्रातील संबंधित महानगरपालिका व नगरपालिकांची आहे. संबंधित महानगरपालिका बारवी धरणातून ज्या प्रमाणात पाणी घेत आहेत, त्याप्रमाणात त्यांनी तेथील प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्याची संधी देण्याची जबाबदारी घ्यावी . किंबहुना हे सूत्र यापूर्वीच मान्य झाले असून नगरविकास विभागाने विविध पदांना मंजुरीही दिली आहे.

त्यामुळे या महापालिकांनी एप्रिल अखेरपर्यंत नोकऱ्या देण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिले. बारवी धरण पुनर्वसन तसेच प्रकल्पग्रस्तांना महानगरपालिकेत नोकऱ्या देण्याबाबतची एक बैठक आज मंत्रालयात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार सर्वश्री.

मनोहर भोईर, सुभाष भोईर, किसन कथोरे, रुपेश म्हात्रे, अतिरिक्त मुख्य सचिव, उद्योग विभाग श्री सुनिल पोरवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी श्री. संजय सेठी, तसेच ठाणे, कल्याण डोंबिवली, मिरा भाईंदर, नवी मुंबई, उल्हासनगर आदि महानगरपालिकांचे आयुक्त तसेच अंबरनाथ बदलापूर नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते. बारवी धरण विस्तार योजनेसाठी प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी घेतल्यावर त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पूर्ण करीत आणली असल्याचे सांगून

श्री. देसाई पुढे म्हणाले की, प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्यांचा प्रश्न पूर्णपणे सोडविण्याचा प्रयत्न आहे. यासाठी जलसंपदा विभागाने पुढील 15 दिवसांत या सर्व बाबींचा तपशील ठरवून तसा शासन निर्णय निर्गमित करावा आणि एप्रिल अखेरपर्यंत सर्व संबंधित महापालिका व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने त्याची अंमलबजावणी करावी असे स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कोरोना चाचणीतून गणेशभक्तांची सुटका नाहीच!

News Desk

शेतकऱ्यांना शाश्वत शेतीकडे वळविण्यासाठी ‘मिशन’ राबविणार! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna

रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगसाठी तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती का?, राष्ट्रवादीचा सवाल

News Desk
महाराष्ट्र

नशीब १६ व्या शतकात संघ नव्हता नाहीतर शिवाजीराजांनाही संघाचे असल्याचे यांनी म्हटले असते- धनंजय मुंडे

News Desk

कोल्हापुर | शहीद राजगुरु हे संघाचे होते अशी चर्चा हे भाजपवाले करु लागले आहेत.स्वातंत्र्यलढयात संघ नव्हता.परंतु ज्यांनी स्वातंत्र्यलढयात आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना संघाचे असल्याचे सांगण्याचे धाडस हे भाजपवाले करत आहेत.नशीब हा संघ १६ व्या शतकात नव्हता नाही तर यांनी छत्रपती शिवाजी महाराजही संघाचे होते असे म्हणायला कमी केले नसते अशी जोरदार टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नेसरीच्या जाहीर सभेत संघपरिवारावर केली.

अरे किती महापुरुषांचा अपमान कराल.किती दिवस सहन करायचा महापुरुषांचा अपमान…त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा हल्लाबोल आंदोलन सुरु केले असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.

सत्तेत असलेल्या भाजपवाल्यांची ट्रिपल तलाक,सबसिडी यावर चर्चा करतात परंतु या देशातील सर्वसामान्य जनतेला दिलेल्या विषयांवर कधी चर्चा करणार असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला.

इतिहास घडवलेल्या मातीत मी पहिल्यांदा आलो आहे. या मातीत लढाईचे स्फुरण आहे. १६ व्या शतकात नेसरीने जो इतिहास घडवला तोच परिवर्तनाचा इतिहास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या हल्लाबोलच्या माध्यमातून घडवल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

Related posts

महापुरानंतर रोगराई वाढण्याची भीती, मेडिकल कॅम्प उभारले जाणार- अमित देशमुख

News Desk

सतराव्या शतकात रायगड जसा होता तसा बघायला आवडेल

News Desk

आर आर आबांच्या सख्ख्या भावाने मुश्रीफांविरोधात तक्रार स्वीकारली…

News Desk