HW News Marathi
महाराष्ट्र

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जादा एसटी सोडण्याचे आदेश

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने रायगडावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शिवभक्त रायगडावर गर्दी करतात. त्यामुळे राज्यातील प्रत्येक जिह्यातून जादा एसटी बस सोडण्याचे आदेश परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिले आहेत. आजपासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे.

रायगडावर यंदा ५ व ६ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४५ वा राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने कोल्हापूरचे शिवाजी महाराजांचे वंशज व खासदार संभाजी राजे यांनी जादा बस सोडण्यासाठी महामंडळाकडे विनंतीपत्र पाठवले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘हे तर उशिरा सुचलेलं शहाणपण’, राज्य सरकारच्या अध्यादेशाच्या निर्णयावर भाजपची टीका!

News Desk

“शिव पंख” लावून द्या, कामावर तरी जाता येईल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर मनसेची खोचक टीका!

News Desk

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अनिल परब घेणार पुन्हा बैठक!

News Desk