HW News Marathi
महाराष्ट्र

Palghar Mob Lynching: ‘त्या’ शब्दांचा चुकीचा अर्थ लावून धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न, राजकारण करण्याची वेळ नाही !

मुंबई | पालघर मॉबलिंचिंक घटेत तीन सांधूची हत्या करण्यात आली. पालघरमधील हा अतिशय दुर्गम भाग असून याठिकाणी रात्रीच्या वेळी काही लोक येतात आणि मुलांना पळवतात. यातूनही संपूर्ण घटना घडली आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधताना सांगितले. या घटनेच्या वेळी हे लोक ओय बस, ओय बस असा आवाज दिला जात होता. ओय बस या शब्दाचा अर्थ बस थांबवा असा होता, मात्र, या शब्दाचा विपर्यास करत शोएब बस असा करण्यात आला, अशी माहिती राज्याचे अनिल देशमुख यांनी दिली आहे.

पालघरमधील ज्या भागात हा संपूर्ण प्रकार घडला. तो संपूर्ण परिसर आदिवासी भागामध्ये मोडत असून येथली लोकांना आदिवासी भाषेत हे लोक बोलत होते. त्यामुळे शब्दाचा विपर्यास करून या प्रकरणाला धार्मिक वळ देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप अनिल देशमुखांनी विरोधाकांवर केला आहे. ही घटना घडल्यानंतर अवघ्या ८ तासांत पोलिसांनी १०१ जणांना ताब्यात घेतले आहे. या १०१ आरोपींमध्ये एकाही मुस्लिम व्यक्तीचे नाव नाही, असेही देशमुखांनी सांगितले. कोणत्याही मुस्लिम व्यक्तीचा या घटनेशी काही संबंध नाही. सध्या महाराष्ट्रातील पोलीस, आरोग्य कर्मचारी सर्व यंत्रणा कोरोनाविरूद्ध लढाई लढत आहे. काही लोक जातीचे राजकारण करत आहेत, ही दुर्देवी घटना आहे. आज राजकारण करण्याची वेळ नाही. करोनाच्या संकटात एकत्र येऊन लढण्याची ही वेळ आहे. करोनाविरुद्धची लढाई आपल्याला जिंकायची आहे, असेही देशमुख म्हणाले.

देशमुख यांनी वाधवान प्रकरणावरही भाष्य

वाधवान कुटुंबीयाचा क्वॉरंटाइन पिरियड आज दुपारी २ वाजता संपणार आहे. ईडी आणि सीबीआयला आम्ही कालच (२१ एप्रिल) पत्र लिहून त्याबाबतची कल्पना दिली आहे. सीबीआयचे अधिकारी जो पर्यंत वाधवान कुटुंबाला ताब्यात घेत नाही तोपर्यंत ते आमच्या ताब्यात असतील. गेल्या १५ दिवसांपासून त्यांना एका हायस्कूलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. राज्य शासन कोणत्याही परिस्थितीत वाधवान कुटुंबाला पाठीशी घालत नाही, असे स्पष्टीकरण अनिल देशमुख यांनी दिले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्व सामान्यांच्या हिताचा अर्थपूर्ण अर्थसंकल्प, पंकजा मुंडे यांनी केले केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत

News Desk

उद्धव ठाकरे सरकार चालवतात की माफियांची टोळी, किरीट सोमय्या यांचा सवाल

News Desk

सरकारी शाळांचे सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर भर देणार! – मुख्यमंत्री

News Desk