HW News Marathi
महाराष्ट्र

पांगरीच्या सरपंचाचा अनोखा उपक्रम

परळी | परळी तालुक्यातील पांगरी येथील गरीब कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी ११ हजार रूपये मदत देऊन त्या कुटुंबाला आधार देण्याचा महत्वपुर्ण उपक्रम पांगरीच्या सरपंच अक्षदा सुशिल कराड यांनी राबवला आहे. ग्रामीण भागातल्या गरीब कुटुंबांना आपल्या मुलींच्या लग्नासाठी अनेकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र यापुढे पांगरीतील कोणत्याही गरीब कुटुंबाला अशी अडचण भासणार नाही. अशी अडचण कुणालाच भासु नये यासाठी प्रत्येक कुटुंबाला ११ हजार रूपये देण्यात येणार आहेत.

पांगरी गावातील बाळु उर्फ गोविंद दत्तू जलदे यांच्या बहिणीच्या विवाहाकरीता परळी नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक कराड यांच्या हस्ते आज ११ हजार रूपये देण्यात आले. यावेळी पांगरीचे पोलीस पाटील माऊली मुंडे पाटील, भाऊसाहेब कराड आदी मान्यवर उपस्थित होते. सरपंचाच्या या अनोख्या उपक्रमाचे सद्या सर्वत्र कौतुक होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकनाथ खडसेंची ५ कोटी ७३ लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त!

News Desk

आता ‘सरकारच्या संकटमोचन’ संजय राऊतांनी धावून यावे !, शेलारांची टीका

News Desk

मराठवाड्यातील शाळांच्या विकासासाठी 200 कोटी, राज्य सरकारचा निर्णय!

News Desk