HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेने पाठींबा दाखवण्यास असमर्थता दाखवली – पंकजा मुंडे

बीड | जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीअगोदरच भाजपने बीडमध्ये माघार घेतली आहे. शिवसेनेने पाठिंबा देण्यास असमर्थता दाखवल्यामुळे पंकजा मुंडेंनी पराभव मान्य असल्याची भूमिका जाहीर करणारी ट्विटर पोस्ट त्यांनी केली. लोकशाही प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून निवडणुकीत उतरणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. बीड जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीच्या सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे.

“राज्यातील आघाडीचा परिणाम जिल्हा परिषदेतही आहे. रात्रीच बीड जिल्ह्यातील शिवसेनेने त्यांची इच्छा असतानाही बरोबर येण्याबद्दल असमर्थता दर्शवली. लोकशाहीची प्रक्रिया म्हणून निवडणूक लढवत आहे बाकी निकाल स्पष्टच आहेत.” अशी भूमिका पंकजांनी स्पष्ट केली.

एकूण ६० सदस्य असलेल्या या जिल्हा परिषदेत २ जिल्हा परिषद सदस्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत तर ६ सदस्यांना या निवडणुकीत मतदानाचा हक्क उच्च न्यायालयाने गोठविला आहे, त्यामुळे ५२ सदस्यांमधून ही निवड होणार आहे. अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागली आहे याचा निकाल १३ जानेवारी २०२० पर्यंत जाहीर करु नये असा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आज निवड प्रक्रिया ही पूर्ण होऊनही निकाल राखून ठेवला जाणार आहे.

पंकजा मुंडेंनी फिरवली होती सत्ताचक्र

अडीच वर्षांपूर्वी निवडणूक झाली तेव्हा जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. पण पंकजा मुंडेंनी सत्ताचक्र फिरवत भाजपाची सत्ता स्थापन झाली. या ऐन निवडणुकीच्या वेळी त्या परदेशात असल्याकारणाने त्याचा परिणाम स्थानिक समीकरणांवरही होताना जाणवला.

राष्ट्रवादीला सत्तेपासून वंचित का राहावं लागलं होतं?

राष्ट्रवादीतील सुरेश धस यांच्यासह ७ सदस्यांनी भाजपात प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला सत्तेपासून वंचित रहावं लागलं. यानतंर सुरेश धस यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. अडीच वर्षांपूर्वी भाजप, शिवसेना, शिवसंग्राम यांनी जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कोरोनाची तिसरी लाट कधी येणार?”, सतेज पाटलांचा सवाल

News Desk

सरन्यायाधिशांना ट्रोल करण्याची हिम्मत करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी! – नाना पटोले

Aprna

राज्यातील धरणांमध्ये ३७ टक्के जलसाठा शिल्लक; ४०१ टँकर्सद्वारे टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा सुरु

Aprna