HW News Marathi
महाराष्ट्र

लवादाच्या बाबत शरद पवारांचे मार्गदर्शन घ्यावे, पंकजा मुंडेंचा सल्ला!

मुंबई | ऊसतोड कामगारांचा संप सुरू असून साखर संघाच्या बैठकीनंतर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतेच ट्वीट केले आहे. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नासाठी सरकार पातळीवर चर्चा करण्यासाठी एक व भाववाढ व कोविड 19 सुरक्षा यावर चर्चा करणारी एक अशा दोन कमिट्या साखर संघाने कराव्यात तसेच साखर संघाचे अध्यक्ष दांडेगावकरजी यांनी त्या कमिटीचे अध्यक्ष असावे असे म्हटले असून या दोन्ही कमिटीनी त्यांचे म्हणणे लवादा समोर मांडावे व चर्चा करावी असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

“ऊसतोड मजुरांना सन्मानजनक वाढ ध्या अन्यथा कोयता चालणार नाही..तसेच या मध्ये करार हा तीन वर्षांचा होईल तसेच कोविड च्या धर्तीवर मजुरांना विमा कवच द्या ही जबाबदारी सरकारने व कारखान्यांने घ्यावी ,कमिटीच्या सूचना लवादासमोर आणाव्या व निर्णय लवादाने घ्यावे अश्या सूचना साखरसंघाच्या बैठकीत केल्या ”, असे त्यांनी ट्विट करत म्हटले आहे.

ऊसतोड कामगार महामंडळाकडे असणारे विषय हातळण्यासाठी धनंजय मुंडेंनाही बैठकीला बोलवावे व त्यांच्याकडे ही जबाबदारी निश्चित करावी त्याचप्रमाणे सरकार पातळीवर आणखी मंत्री महोदय जसे की, आरोग्यमंत्री, कामगार मंत्री, महिला व बालकल्याण मंत्री यांनाही बोलवावे असेही त्या म्हणाल्या आहेत.

लवादाच्या बाबत अत्यंत अनुभवी सन्माननीय शरद पवार साहेब यांचे मार्गदर्शन घ्यावे.संप हा मजुरांच्या हक्कासाठी आहे कोणाचीही राजकीय पोळी भाजण्यासाठी नाही, माझे ऊसतोड कामगार हे राजकीय प्यादे नाहीत असे ही पंकजा मुंडे ट्विट करत म्हणाल्या आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आगामी काळात राज्यात ३० ते ४० हजार कोटी रूपयांची गुंतवणूक होणार! – उद्योग मंत्री उदय सामंत

Aprna

आमचे पुढचे लक्ष्य हे पेट्रोलपंपावर लावलेले पंतप्रधान मोदीजींचे फ्लेक्स असेल – रुपाली चाकणकर 

News Desk

साखरेच्या गोडव्याने अजित पवार-हर्षवर्धन पाटील यांच्यातील कटुता संपली? पाटील- पवार यांच्यात गुफ्तगु..

Arati More