HW News Marathi
महाराष्ट्र

लोकनेते मुंडे साहेबांची अपूर्ण लढाई लढायचीयं – पंकजा मुंडे

औरंगाबाद | ओबीसींची जनगणना झालीचं पाहिजे,असे मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज औरंगाबादेत व्यक्त केले.याच्यात प्रत्येत गोष्टी रडारवर येतील आणि स्पष्ट होतील. ओबीसींना आणि वंचित समुदायाला न्याय देण्यासाठी आपण जातीनिहाय जनगणनेची मागणी केली आहे, लोकनेते मुंडे साहेबांची ही अपूर्ण लढाई मला लढायचीयं असा पुनरूच्चार भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना केला.

या प्रश्नांवर पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या,

ओबीसी समाजाच्या जनगणनेची मागणी मी केली आहे. कोणत्याही पदावर नसताना ही चळवळ मला लढायची आहे. ओबीसीची जनगणना झाली पाहिजे ही भूमिका मुंडे साहेबांनी वेळोवळी मांडली. खासदार डॅा.प्रीतम मुंडे यांनी देखील संसदेत आवाज उठवला आहे. आता जनगणना होणार आहे, जनगणना होत असताना ती पाऊलं सकारात्मक पडली पाहिजेत. जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. याच्यात प्रत्येक गोष्टी रडारवर येतील आणि स्पष्ट होतील. त्या समुदायाला न्याय देण्यासाठी मदत होईल,” असं त्या म्हणाल्या. जालना येथील ओबीसी मोर्चातील अनुपस्थिती बद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, ‘कार्यक्रमात असणं हे महत्वाच नाही, त्या चळवळीचा भाग आम्ही अनेक वर्षे आहोत’ असही त्या म्हणाल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाच महिन्यांत १९ हजार ५५३ तरूणी, महिला बेपत्ता

Sanjay Jog

राजा उदार झाला, हाती भोपळा आला – देवेंद्र फडणवीस

News Desk

“सुधीर मुनगंटीवारांचे विनोदी कार्यक्रम ठेवले तर लोक गर्दी करतील”, राऊतांचा खोचक टोला

News Desk