HW News Marathi
महाराष्ट्र

वैद्यनाथ साखर कारखान्याचे कोणतेही बॅक खाते जप्त झाले नाही, हा केवळ राजकीय खोडसाळपणा

बीड | वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे कोणतेही बॅक खाते जप्त झालेले नसून यासंदर्भात येत असलेल्या बातम्या चुकीच्या असल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक जी पी एस दीक्षितूलू यांनी म्हटले आहे. दुष्काळ आणि अन्य आर्थिक कारणांमुळे वैद्यनाथ कारखाना सध्या आर्थिक अडचणीतून जात आहे. अशा कठीण परिस्थितीत अशा प्रकारच्या बातम्या देणं आणि शेतकऱ्यांचं भवितव्य धोक्यात आणणं  हे एकूणच राजकीय खोडसाळपणाचे आहे. कारखान्याचे असे कोणतेही खाते सील झालेले नाही असे कार्यकारी संचालक दीक्षितूलू यांनी म्हटले आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या या कारखान्याचं कोणतंही बॅंक खातं सील केलं नाही आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडे मार्च 2018 ते ऑगस्ट 2019 या काळातील कर्मचारी आणि कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची एकूण 1.46 कोटींची रक्कम थकीत होती. उर्वरित 56 लाख रुपयांच्या वसुलीसाठी कार्यवाही सुरु असल्याचे ईपीएफओ कार्यालयाने सांगितले आहे. सर्व थकबाकीदारांनी थकीत भविष्य निधी देयकांचा त्वरित भरणा करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त जगदीश तांबे यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नांदेड शहरात आता दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी “नो-व्हेईकल डे” 

News Desk

जनसामान्यांशी घट्ट नाळ असलेला लोकनेता हरपला – अजित पवार

News Desk

शरद पवारांनी बोलावली बैठक, संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर निर्णय

News Desk