HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनाचे रुग्ण पळून जाऊ नयेत म्हणून आता पोलीस आणि प्रशासनाने घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई | कोरोनाची देशातील संख्या ही सद्यस्थितीला १९९ असून महाराष्ट्रात ४९ अशी संख्या आहे. काल (१९ मार्च) पंतप्रधान नरेंद मोदी यांनी २२ मार्चला जनता कर्फ्यु असल्याची घोषणा केली. कारण परेशातून येणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाची लागण होत आहे. तसेच, ज्यांना सेल्फ कोरोंटाईनमध्ये राहण्यास सांगितले आहे त्यांच्या पळून जाण्याच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाने लोकांच्या फोनमध्ये जीपीएसद्वारे त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची सोय करण्याचा विचार केला आहे. मुंबई विमानतळावर परदेशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी केल्यानंतर त्यांच्या मोबाइलवरचे लोकेशन ट्रॅक करण्यासाठी पोलिसांची मदत पालिका प्रशासन करणार आहे.
कोरोनाच्या विषाणूचा देशात सामूहिक संसर्ग झालेला नाही. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वसनविकार बळावलेल्या सुमारे ८२० लोकांच्या रक्ताचे नमुने गोळा करून त्यांची चाचणी केली. यापैकी कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही, ही बाब दिलासादायक आहे. दरम्यान, पुढील १० दिवस हे देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी दिली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी सरकारला सहकार्य करून गर्दी टाळावी आणि काही काळ घरी राहावे असे आवाहनही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राम मंदिर वर्गणीतून बांधणार ? हा तर 2024 च्या निवडणुकीचा प्रचार !

News Desk

पूजा चव्हाण प्रकरणावर धर्मगुरुंच्या साक्षीने अखेर संजय राठोड बोलणार ?

News Desk

“महाविकासआघाडी सरकारच्या संवेदना बधीर झाल्या”, फडणवीसांची शिक्षकांच्या आंदोलनावरुन सरकारवर टीका

News Desk