HW News Marathi
महाराष्ट्र

आपले आमदार जाऊ नये या भीतीने कदाचित देवेंद्र फडणवीस बोलत असावे – रोहित पवार  

अहमदनगर | “विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच भाजप हे महाविकास आघाडीचे सरकार पडणार असल्याचं दर तीन महिन्यांनी सांगत असतात. आपले आमदार जाऊ नये या भीतीने ते असं बोलले असावेत,” असा टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी फडणवीसांना लगावला. ते अहमदनगरमध्ये ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली.

“महाविकास आघाडीचे सरकार जाईल असं पहिल्या दिवसापासून म्हणणाऱ्या लोकांना हे सरकार अजूनही चालत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे दर तीन महिन्याला सरकार पडणार असल्याचं विरोधक सांगतात. आपले आमदार जाऊ नये या भीतीने कदाचित देवेंद्र फडणवीस बोलत असावे, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

तसेच यावेळी बोलताना रोहित पवार यांनी अमित शहा यांच्यावरही टीका केली. शिवसेनेने बाळासाहेब ठाकरेंचे तत्व सोडले आहे. आम्ही तुमच्यासारखे वागलो असतो तर शिवसेना पक्ष संपला असता, अशा शब्दात अमित शाह यांनी शिवसेनेवर टीका केली होती. तसेच, शिवसेनाला मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन दिलं नव्हतं असंही अमित शाह यावेळी सांगितलं होत. पुढे बोलताना त्यांना महाविकास आघाडीवरसुद्धा टीका केली होती.

आता अमित शाह यांच्या या वक्तव्यांचा रोहित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. “भाजपमधील कोणत्याही व्यक्तीला महाविकास आघाडीचा प्रयोग पचलेला नाही. भाजपने विश्वासघात केल्याची भावना शिवसेनेमध्ये होती. महाविकास आघाडीच्या माध्यमातून देशातली जनतेसमोर एक वेगळा संदेश गेलेला आहे. या प्रयोगामुळे भाजपसोबत युती केलेल्या देशातील स्थानिक मित्रपक्षांनी भाजपबद्दल बोलताना आवाज वाढवला आहे. याच गोष्टीमुळे अमित शाह तसे बोलले असतील,” असे रोहित पवार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भिमा कोरेगावचे पडसाद उल्हासनगरात . संपुर्ण शहर बंद .

News Desk

विदर्भाच्या दौऱ्यावेळी मुख्यमंत्र्यांचा ताफा प्रकल्पग्रस्तांनी रोखला

swarit

महाराष्ट्र झोपेत असताना सरकार पडेल, कळणारच नाही ! चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा

News Desk