HW News Marathi
महाराष्ट्र

“पवाराचं कलरफुल राजकारण आहे”, गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबोल!

मुंबई। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न उभा होता, आणि यासाठी कर्मचारी संपावर गेले होते. आणि त्यांच्या याच मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू होतं. अखेर राज्य सरकारने काल (24नोव्हेंबर) कर्मचाऱ्यांच्या पगार वाढ केली. आता याच मुद्द्यावरून वकील गुणरत्न सदावर्ते यांनी काही आरोप केले आहेत. नऊ जणांच्या शिष्टमंडळाने राज्य सरकारसमोर केवळ विलीनीकरणाची मागणी केली. मात्र, मंत्री कालच्या बैठकीत खोटे बोलले. पत्रकार परिषदेत दोन आमदार गेले आणि आम्ही कामगारांचे नेते म्हणून भूमिका मांडत आहोत म्हणाले. यावेळी कामगार शिष्टमंडळाला कोंडून ठेवले, असा आरोप गुरुवारी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला. राज्यव्यापी एस. टी. संप विलीनीकरणासाठी सुरूच ठेवणार असल्याची घोषणा केल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवारांवरही जोरदार टीका केली. पवारांचे कलरफुल राजकारण आहे. त्यांनी संपकऱ्यांना तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते कालच्या परीक्षेत नापास झाले आहेत, अशी टीका आता सदावर्ते यांनी केली आहे.

अनिल परबांचा आम्ही राजीनामा मागत आहोत

यावेळी सदावर्ते यांनी संपूर्ण महाविकास आघाडी वरच तोफ डागली होती. नऊ जणांच्या शिष्टमंडळाने राज्य सरकारसमोर केवळ विलीनीकरणाची मागणी केली होती. मात्र, मंत्री कालच्या बैठकीत खोटे बोलले. पत्रकार परिषदेत दोन आमदार गेले आणि आम्ही कामगारांचे नेते म्हणून भूमिका मांडत आहोत म्हणाले. काल कामगार शिष्टमंडळ गेले. त्यांना आत कोंडून ठेवले गेले. बाहेर येऊ दिले नाही. शिष्टमंडळ बाहेर येऊन सत्य सांगतील म्हणून त्यांना पोलिसांच्या बंदोबस्तात बाहेर काढले. त्यामुळे परबांचा आम्ही राजीनामा मागत आहोत. त्यांना तत्काळ बडतर्फ करा. अन्यथा त्यांची तक्रार राज्यपालांकडे करू, असा इशाराच आता गुणरत्न सदावर्ते यांनी महाविकास आघाडीतील परिवहन मंत्री अनिल परब यांना दिला आहे .

सुप्रिया सुळेही टार्गेट

याबरोबरच सदावर्ते यांनी आपली टीकेची झोड शरद पवार, अनिल परब यांच्या पुरताच न ठेवता खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर देखील उठवली. सदावर्ते म्हणाले की, एस. टी. कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येबद्दल राज्यातील 250 डेपोतील कर्मचाऱ्यांनी दुखवटा पाळला. मात्र, याचा कळवळा खासदार सुप्रिया सुळेना आला नाही. त्यांना आर्यन खानचा कळवळा आला होता. मग आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला का गेला नाहीत, असा सवाल त्यांनी यावेळी केला. पवारांनी काल कलरफुल राजकारण केले. मात्र, ते परीक्षेत नापास झाले, अशी बोचरी टीका देखील कर्मचाऱ्यांचा संपावरून सुप्रिया सुळे यांच्यावर केली आहे.

समितीचा अहवाल उच्च न्यायालयात पाठविला जाणार

गेले १६ दिवस कर्मचाऱ्यांसोबत आम्ही ठाण मांडून बसले. एसटी कर्मचाऱ्यांची वेतन वाढ ही मागणी होती. पण ती मागणी पूर्ण न झाल्याने त्यांनी विलीनीकरणाची मागणी पुढे आली. आता राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना चांगली वेतन वाढ केली आहे. या समितीला विलीनीकरणाचा निर्णय १२ आठवड्याच्या आत समितीने घेण्याचा आदेश देण्यात आला आहे. समिती जो अहवाल मुख्यमंत्र्यांसमोर मांडला जाईल. यानंतर समितीचा अहवाल उच्च न्यायालयात पाठविला जाणार आहे. “उच्च न्यायालयाने विलीनीकरणाबाबत समिती स्थापन केली आहे. या समितीची जो निर्णय येईल तो आम्ही मान्य करू अशी आमची भूमिका पूर्वीच जाहीर केली होती,” असे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्टे केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोवा काँग्रेसच्या १० आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश, दिल्लीत घेणार शहांची भेट

News Desk

देवेंद्र फडणवीसांचं ट्विटद्वारे शरद पवारांवर टीकास्त्र

Aprna

शरद पवारांचा आज एकदिवसीय अमरावती दौरा, विदार्भात मोठा पोलीस बंदोबस्त

Aprna