HW News Marathi
महाराष्ट्र

‘महाविकासआघाडीचे कारभारी अपयशी म्हणून पवारांना या वयात बांधावर जावं लागतयं’,पडळकरांची टिका…

सांगली | महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सध्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दौरा करत आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा सोलापूरच्या भागातील नुकसानीची पाहणी करणार आहेत.एकीकडे शरद पवार सत्ता असताना किंवा नसतानाही शेतकऱ्यांसाठी धावून येतात अशा शब्दांत त्याचं कौतुक केलं जात असताना भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी पुन्हा एकदा पवारांवर टीकास्त्रसुद्धा सोडलं आहे.

‘शरद पवार यांना या वयात बांधावर उतरायला लागत आहे, हेच या महाआघाडीचं अपयश आहे’अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी केली आहे. जे कारभारी त्यांनी या सरकारमध्ये बसवलेले आहेत, हे कारभारी सरळ सरळ अपयशी ठरले आहेत, त्यामुळे पवार साहेबांना बांधावर जाऊन पाहणी करावी लागतेय, शरद पवार हे सत्ताधारी पार्टीचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार तयार झालेले आहे. मागचा दौरादरम्यान शरद पवार साहेब हे विरोधी पक्षात होते तेव्हाचा होता. आता सत्ताधारी असतानाही त्यांना दौरे करावे लागत असल्याची टीका गोपीचंद पडळकरांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमदार शिवाजी कर्डिलेच्या पोलीस कोठडीत वाढ

News Desk

मुंबई पोलिसांची नाचक्की करणाऱ्या गृहमंत्र्यांना हटवावं, भाजपची मागणी

News Desk

पूजा चव्हाण प्रकरणावर संजय राऊत म्हणतात…

News Desk