HW News Marathi
महाराष्ट्र

केरळमधील नागरीकांना पुण्यातून जाणार पिण्याचे पाणी

पुणे | केरळमध्ये ८ ऑगस्टपासून सुरु असलेल्या पावसामुळे महापूरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या या पुरग्रस्त परिस्थितीमुळे नागरिकांना पिण्याचे पाणीही मिळणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून शनिवारी सात लाख लिटर पाणी रेल्वेने केरळला पाठवले जाणार आहे. तसेच रतलाम येथून १४ लाख ५० हजार लिटर पाण्याचे वॅगन पुण्यात येणार आहे. असे एकूण २१ लाख ५० हजार लिटर पिण्याचे पाणी केरळला रवाना केले जाणार आहे.

रतलाम येथूनही १४ लाख ५० हजार लिटर पाण्याचे २९ वॅगन दुपारी १ वाजता पुण्यात दाखल झाल्यानंतर एकूण ४३ वॅगनमध्ये २१ लाख ५० हजार लिटर पाणी घेऊन ही विशेष रेल्वे दुपारी २ वाजता केरळकडे रवाना होईल. केरळ मधील कयनकुलम जंक्शनवर हे पाणी पोहचवले जाईल. पुण्यातील रेल्वे च्या अधिकारी व कर्मचा-यांकडून काल रात्रीपासून यासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

फडणवीसांच्या दिल्ली मेट्रो प्रवासावरुन कॉंग्रेस, राष्ट्रवादीची टोलेबाजी

News Desk

गृहमंत्र्यांनी कंगनाला धमकावले, हे आम्ही चालू देणार नाही – किरिट सौमय्या 

News Desk

अर्थसंकल्प हा निवडणुकीचा जाहीरनामा आहे, की सरकारी मालमत्ता विक्रीचे संकल्प पत्र !- बाळासाहेब थोरात

News Desk