HW News Marathi
महाराष्ट्र

देशाचा पंतप्रधान कोण, मोदी की शहा ?

नागपूर- अच्छे दिन आणायचे असेल तर पैसे लागतात, पण महाराष्ट्र सरकारची तिजोरी रिकामनी आहे. हे भिकारचोट सरकार आहे, त्यांच्या खिशात दमडी शिल्लक नाही, अशी खोचत टीका महाराष्ट्राचे माजी अधिवक्ता आणि ज्येष्ठ विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केली आहे. मोदी, शहा हे दोघेचे देश चालवत असून त्यांच्यात पंतपप्रधान कोण आहे, असा सवाल अणे यांनी केला आहे.

विदर्भ राज्य आघाडीतर्फे वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी १ मे पासून रक्ताक्षरी अभियान सुरू करण्यात आले होते. या अभियानाचा समारोप रविवारी संविधान चौकात झाला. याप्रसंगी अ‍ॅड. अणे बोलत होते. राज्य सरकारच्या एकूण उत्पन्नापैकी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि कर्ज फेडण्यासाठी ६० टक्के पैसे खर्च होतात. उरलेले ४० टक्के उत्पन्न हे जीएसटीपोटी केंद्र सरकार घेऊन गेले आहे. यामुळे महाराष्ट्रासह सर्वच राज्यांचे पैसे संपले असून राज्य सरकारला आपल्या हिश्शाचे पैसे आणण्यासाठी दिल्लीपुढे हात पसरावे लागतात,असे अणे म्हणाले. इतर राज्यातही अशीच स्थिती असल्याचे सांगताना त्यांनी बिहारचे उदाहरण दिले. नितीश कुमार यांनाही केंद्राच्या मदतीसाठी मोदींच्या गोटात जावे लागले, असा दावा त्यांनी केला.

देशात मोदी आणि शाह हे दोनच नेते आहेत. त्यातील पंतप्रधान कोण हे कळत नाही, पण त्यांना वाटेल तसेच देशात होते. मोदी कुणाचेही ऐकत नाहीत, असे खुद्द भाजपचे खासदार सांगतात. अशा स्थितीत १० हजार रक्ताक्षऱ्या बघून मोदींचे मत परिवर्तन होईल याची शक्यता नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे धनगर समाजाचा उद्रेक

News Desk

पुणे पदवीधर शिक्षकसाठी विजयाचा कोटा ठरण्यासाठी रात्रीचे 9 वाजणार…

News Desk

आयपीजीए नॉलेज सीरीज यांच्यातर्फे खरीप पिकांची सद्यस्थिती या विषयावर वेबिनार आयोजित

News Desk