HW News Marathi
Covid-19

पंतप्रधानांचे ‘ते’ पॅकेज निव्वळ ‘जुमला’, पृथ्वीराज चव्हाणांची टीका

मुंबई | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘आत्मनिर्भर भारता’साठी मोदी सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजवर जोरदार टीका केली आहे. हे पॅकेज म्हणजे केवळ ‘जुमला’असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. “पंतप्रधानांनी जेव्हा या आर्थिक पॅकेजची घोषणा केली तेव्हा मी स्वतः त्या घोषणेचे स्वागत केले होते. मात्र, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ५ प्रदीर्घ पत्रकार परिषदांमधून या पॅकेजचा तपशील जाहीर केल्यानंतर देशाची मोठी निराशा झाली. मोदी सरकारच्या या पॅकेजद्वारे देशातील कोणत्याही घटकाला थेट आणि तातडीने दिलासा मिळणार नाही”, असे पृथ्वीराज चव्हांनी म्हटले. “स्वातंत्र्यानंतरच्या प्रत्येक पंतप्रधानाने देशाला स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोदींनी आत्मनिर्भरतेचा शोध लावल्याचा आविर्भाव दुर्दैवी आहे”, असेही ते म्हणाले आज (२५ मे) पृथ्वीराज चव्हाण यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था संकटात आहे. लोकांच्या हातात पैसे नसल्याने ते खरेदी करत नाही. त्यामुळे बाजारपेठेतली मागणीच नष्ट झाली आहे. मागणीच नसल्याने पुरवठादारांच्या किंवा उद्योजकांच्या मालाची विक्री होणे अवघड आहे. देशाची अर्थव्यवस्था अशी संकटात असताना जागतिक अर्थतज्ज्ञांनी देखील भारतामध्ये गंभीर आर्थिक मंदी येईल असे भाकीत वर्तविले आहे. त्याचप्रमाणे, अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्याचे असेल तर देशातील मागणी वाढण्याची आवश्यकता आहे. यासाठी देशातील सरकारने अधिक खर्च करणे आवश्यक असल्याचे मतही या अर्थतज्ज्ञांनी मांडले आहे. मी स्वतः देखील एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून अर्थव्यवस्थेच्या किमान १० % म्हणजेच २१ लाख कोटींचे प्रोत्साहन पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यामुळे पंतप्रधानांनी हे पॅकेज जाहीर केले तेव्हा मी त्याचे स्वागत केले. त्यानंतर तपशील ऐकून मात्र निराशा झाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांची आज पत्रकार परिषद

News Desk

राज्यात पुन्हा एकदा एका दिवसात १० हजारांच्या पुढे कोरोना रुग्ण आढळले

News Desk

देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट, गेल्या 24 तासांत 40 हजारांच्या खाली आढळले रुग्ण

News Desk