HW News Marathi
महाराष्ट्र

कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत ६० हजार गुन्हे दाखल

मुंबई | राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात दि.२२ मार्च ते २०एप्रिल या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ६०, ००५ गुन्हे दाखल झाले आहेत तर १३,३८१ व्यक्तींना अटक करण्यात आली असून ४१,७६८ वाहने जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.

उपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या १०० नंबर वर ७५,११५ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे, अशा ५८९ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १०६२ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्याभरात नोंदवले आहेत.

या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी २कोटी ३० लाख(२ कोटी ३० लाख ) रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

पोलिसांवर हल्ला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस कर्मचारी अधिकारी दिवस-रात्र कार्यरत आहेत . मात्र दुर्दैवाने या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या १२१घटनांची नोंद झाली असून यात ४११ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरेंच्या मदतीला धावले मुकेश अंबानी, गुजरातवरुन महाराष्ट्राला देणार ऑक्सिजन

News Desk

‘शिवसेनेच्या नेत्यांवर कुठे गुन्हे दाखल केले?’ रामदास आठवलेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

News Desk

चांदणी चौक परिसरातील जुना पूल पाडून रस्त्याच्या मार्गिकेचे काम त्वरित करण्याचा निर्णय

Aprna