HW News Marathi
महाराष्ट्र

भिमा-कोरेगाव दंगली प्रकरणी साक्षीदार पूजा सकटचा मृत्यू

भिमा-कोरेगाव | भिमा-कोरेगाव दंगली प्रकरणी एकमेव साक्षीदार १९ वर्षीय पूजा सुरेश सावट हिचा संशयास्पद मृत्यू झाला. पूजाचा मृतदेह विहिरत आढळल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुजा सावट ही २१ एप्रिल रोजी बेपत्ता झाली असून तिच्या कुटुंबियांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर २२ एप्रिल रोजी सकाळी पूजाचा मृतदेह वाडा पुनर्वसन येथील एका विहिरीमध्ये आढळून आला. पुण्यातील ससून रुग्णालयात पूजाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. तिच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी ९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ‘पूजा सावट ही भिमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी एकमेव तक्रारदार होती. पोलिसांनी तिच्या एफआयआरवर तपास केलेला नाही. तर आता तिच्या मृत्यू प्रकरणी तरी पोलिसांनी निष्पक्ष तपास करावा,’ अशी मागणी बारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

  • भिमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण

१ जानेवारी रोजी भिमा-कोरेगाव येथील वियजस्तंभाला अभिवादन करण्यासाठी बौद्ध अनुयायी गेले होते. या अनुयायांवर जाळपोळ आणि दगडफेकही झाली होती. या हिंसाचारात पूजा सावटचे घर जाळण्यात आले. या हिंसाचारात पूजा सावट ही एकमेव साक्षीदार होती. तिचे घर जाळण्यात आल्यानंतर पूजाचे कुटुंब भिमा-कोरेगाव हिंसाचारनंतर जवळी वाडा नावाच्या गावात राहण्यासाठी गेले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

प्रकल्पांना तात्काळ मंजुरी देईन…

swarit

वानखेडेंविरोधात आरोप कोर्टात करा, ट्विटरवर का करता? क्रांती रेडकरचे मलिकांना प्रतिउत्तर

News Desk

माझ्यासाठी आपला सर्वांचा जीव महत्वाचा, राज्याभिषेक सोहळा घरीच साजरा करा

News Desk
देश / विदेश

भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या पाच सैनिकांना कंठस्नान

News Desk

श्रीनगर | भारतीय लष्कराने राजौरी आणि पूँछ या परिसरात पाकिस्तान विरोधात आज मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पाकिस्तानचे पाच जवानांना कंठस्नान घातले असून पाकचे तीन बंकर उदध्वस्त करण्यात आले. या गोळीबारीत पाकिस्तानचे २० जवान ठार झाल्यांची माहिती मिळाली आहे.

पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहेत. पाकिस्तानकडून झालेल्या कारवाईत भारतीलय लष्करांने चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाई पाक व्याप्त कश्मीरमधील काही नागरिक जखमी झाल्याचे समजते. तसेच जानेवारी महिन्यात जम्मू-कश्मीरमधील भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या दोन चौक्या उदध्वत करण्यात आल्या होत्या.

Related posts

महाराष्ट्राची महिला व बालविकास क्षेत्रातील कामगिरी अफगाणिस्तानसाठी मार्गदर्शक ठरेल !

News Desk

अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता सादर करण्यामागचे हे कारण तुम्हाला माहीत आहे का?

News Desk

‘नजरचुकीने’ केलेली व्याजदर कपातीची ‘चूक’ सुधारली पण इंधन दरवाढीची ‘घोडचूक’ कधी सुधारणार?

News Desk