HW News Marathi
महाराष्ट्र

…तर कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करु शकलो असतो – प्रकाश आंबेडकर

पुणे | केंद्र आणि राज्य सरकारकडे अर्थव्यवस्था कशी बदलली पाहिजे याबद्दल कोणतीही योजना नाही. अर्थव्यवस्थेसंबंधी योजना असती तर कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करु शकलो असतो असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. प्रकाश आंबेडकर कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला आज (१ जानेवारी) अभिवादन करण्यासाठी पोहोचले होते. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथे दरवर्षी होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. अनुयायांना घऱातूनच अभिवादन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी १ जानेवारी या देशातील सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिवस असल्याचं आम्ही मानतो असं सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाविकांची बस 100 फुटांवरून पंचगंगा नदीत कोसळली 13जणांचा मृत्यू

News Desk

“मग हे झारीतले शुक्राचार्य कोण जे महाराष्ट्रातील लोकांच्या जीवाशी खेळतायत?”,राऊतांचा सवाल

News Desk

“… म्हणून कोणीला वाघ होता येत नाही”, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

Aprna