HW News Marathi
महाराष्ट्र

“मनसे, भाजप जवळ येत असतील तर राज्याच्या हिताचे”- दरेकर

औरंगाबाद | जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून राज्यात भाजपची लहर दिसून येत आहे. भाजप निवडणुकीसाठी तयार आहे. मनसे आणि भाजपच्या युतीचा सध्या कुठलाही प्रस्ताव आणि विचारही नाही. मात्र, मनसेचे पदाधिकारी भाजप जवळ येत असतील तर ते राज्याच्या हिताचे असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शनिवारी औरंगाबादेत माध्यमांशी बोलताना सांगितले

मनसेप्रमुख राज ठाकरे जे बोलले ते खरे आहे

मनसेप्रमुख राज ठाकरे जे बोलले ते खरे आहे. राज यांच्या मताशी मी सहमत असून राज्यात राष्ट्रवादीमुळेच जातीवाद वाढला आहे, अशी टीकाही प्रवीण दरेकर यांनी केली. राष्ट्रवादी, शिवसेनेचे अनेक कार्यक्राम झाले तेव्हा कोरोना वाढला नाही का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावेळी आमदार हरिभाऊ बागडे, राधाकिसन पठाडे, राजगौरव वानखेडे, राम बाबा शेळके व पदाधिकारी उपस्थित होते.

दरेकर पुढे म्हणाले, की मनसे एक जबाबदार पक्ष आहे, आमच्यात जर सलोख्याचे वातावरण होत असेल तर स्वागत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे नेते राज ठाकरे यांची भेट झाली होती. तथापि, सध्या युती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भ्रूण हत्येप्रकरणी सांगली पोलिसांचे कोल्हापूरात छापे

News Desk

पक्ष दोषी नसतो, नेतृत्व करणाऱ्याचे चुकते !

News Desk

महाराष्ट्रात बंदरे विकासाची प्रचंड क्षमता; केंद्र शासनाच्या सहकार्याची आवश्यकता – अस्लम शेख

News Desk