HW News Marathi
महाराष्ट्र

संवेदनाहीन सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही – प्रवीण दरेकर

जालना | मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असून देशोधडीला लागलेला शेतकरी शासनाच्या मदतीची वाट पाहात आहे. परंतु संवेदनाहीन सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही, या सरकारने बळीराजाला वाऱ्यावर सोडले आहे, अशा तीव्र शब्दांत विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सरकारचा निषेध करत टीका केली आहे.

यंदा सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस मराठवाड्यात झाला आहे. या पावसामुळे अनेक गावं उद्ध्वस्त झाली आहेत. ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मोसंबी आणि तुरीची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिने झाले तरी अद्याप पंचनामे झाले नाहीत. त्यामुळे आमची मागणी एवढीच आहे की सरसकट पंचनामे करा आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा करा, भाजपच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण ही मागणी केल्याचे दरेकर यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“भगवान रामाप्रमाणे भविष्यात मोदींना पुजले जाईल”, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्याचा दावा

News Desk

तेजस ठाकरेंनी केलेले काम महाराष्ट्राची मान उंचावणारे आहे, आशिष शेलारांनी थोपटली पाठ

News Desk

…तर राजू शेट्टींनी भर चौकात विष्ठा खाण्याची तयारी ठेवावी !

News Desk