HW News Marathi
महाराष्ट्र

 महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाबाबत कधीही शब्द दिला नव्हता –   प्रवीण दरेकर

मुंबई | बिहारमध्ये आम्ही जेडीयूला आम्ही शब्द दिला होता तो आम्ही पाळला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेला शब्द आम्ही दिलाच नव्हता असं भाजपचे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. “बिहारमध्ये भाजपने आधीच जाहीर केलं होतं त्यानुसार जेडीयू चे नेते नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होतील. भाजपने दिलेला शब्द पाळला. मात्र महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाबाबत कधीही शब्द दिला नव्हता” असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. बिहारमध्ये आज नितीश कुमार यांचा शपथविधी पार पडतो आहे. सलग चौथ्यांदा ते बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर भाजपाकडून दोघांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर बोलत होते. टीव्ही ९ मराठीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

बिहारमध्ये बहुमत मिळवल्यानंतर भाजप- संयुक्त जनता दलाने आज मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या शपथविधीचं आयोजन केलं आहे. नितीश कुमार मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, तर भाजपकडून दोघांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दरेकरांनी आपलं मत व्यक्त केलं. बिहारमध्ये कमी जागा येऊनही भाजपने नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्रिपद दिलं आहे. मात्र इथे भाजपने दोन उपमुख्यमंत्रिपदं स्वत:कडे घेतली आहेत. त्याबाबत प्रवीण दरेकर म्हणाले, “भाजपने दोन उपमुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय कोणत्याही दहशतीमुळे घेतलेला नाही. बिहार हे मोठे राज्य आहे.

त्यामुळे दोन उपमुख्यमंत्री नेमण्यात आले आहेत. त्यातही महिलांचे प्रश्न समजून घेऊन निर्णय घेण्यासाठी महिला उपमुख्यमंत्री देण्यात आल्या आहेत” महाराष्ट्रात शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाची मागणी केली होती, मात्र भाजपने याबाबतचा शब्द कधीच शिवसेनेला दिला नव्हता, असंही प्रवीण दरेकर यावेळी म्हणाले. बिहारमध्ये आधीच नितीश कुमार हेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार ठरले होते, त्यानुसार भाजपने शब्द पाळला, असं दरेकरांनी अधोरेखित केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पातील ‘या’ महत्त्वाच्या तरतुदी

swarit

मन हेलावणारी पोलीस भरती

News Desk

ठाण्यात कारमध्ये व्यावसायिकाची आत्महत्या

News Desk