HW News Marathi
महाराष्ट्र

म्हणून परत एकदा पाहिजे फडणवीस सरकार!- नितेश राणे

मुंबई | कर्नाटकमध्ये मराठा समाजासाठी महामंडळ स्थापन करण्यात आले आहे, कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी या महामंडळाची घोषणा केली. या घोषणेनंतर भाजप नेते नितेश राणे यांनी महाविकासआघाडीवर जोरदार टीका केली आहे. कर्नाटकात मराठा समाजासाठी महामंडळाची स्थापन केली. पण महाराष्ट्रात मराठ्यांना फडणवीस सरकारने दिलेले सगळे बंद करुन टाकले, असा टोला नितेश राणेंनी लगावला आहे.“कर्नाटकच्या भाजपा सरकारने मराठा विकास महामंडळाची स्थापना केली, ५० हजार कोटींची तरतूद पण केली!!! आणि इथे महाराष्ट्रात मराठ्यांना फडणवीस सरकारने दिलेले सगळे बंद करुन टाकले..म्हणून पाहिजे परत एकदा.. फडणवीस सरकार!” असे ट्वीट नितेश राणे यांनी केले आहे.

मराठा समाजाची शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी कर्नाटक सरकारकडून मराठा समाजासाठी महामंडळाची स्थापन करण्यात आली. या महामंडळासाठी पहिल्या टप्प्यात ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी या महामंडळाची घोषणा केली. मराठा समाजाच्या प्रगतीसाठी या महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी संपाची तीव्रता अधिक वाढली

News Desk

आमदार पुत्र कोरोनामुक्त व्हावा यासाठी देवीचा दुग्धाभिषेक व महापूजा केली जातेय 

News Desk

वंचित बहुजन आघाडीची ३० जुलैला उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार

News Desk