HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधान मोदी ११ एप्रिलला सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ‘लॉकडाऊन’ वाढणार?

मुंबई | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. संपूर्ण देशभरातील हा लॉकडाऊन येत्या १४ एप्रिल संपणार आहे. मात्र, देशभरात लॉकडाऊन असून कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस पाच हजारांच्या वर गेला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आज (८ एप्रिल) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील प्रमुख राजकीय पक्षांच्या गटनेत्यांशी संवाद साधला. यावेळी देशातील लॉकडाऊनचा काळ वाढविण्यावर चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

देशातील लॉकडाऊनचा कार्यकाळ वाढविण्यासाठी येत्या ११ एप्रिल रोजी पुन्हा एकदा सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार असल्याचे या बैठकीत पंतप्रधान मोदींनी म्हटले. देशात सध्या महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक असून त्यापाठोपाठ तामिळनाडू, दिल्ली, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. देशातील इतर राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे.

ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत भाजप, काँग्रेस, डीएमके, एआयएडीएमके, टीआरएस, सीपीआयएम, टीएमसी, शिवसेना, राष्ट्रवादी, अकाली दल, एलजेपी, जेडीयू, एसपी, बीएसपी, वायएसआर काँग्रेस आणि बीजेडी या पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. तृणमूल काँग्रेसकडून टी आर बालू, एआयएडीएमकेच्या वतीनं नवनीत कृष्णन, काँग्रेसकडून गुलाब नबी आझाद आणि अधीर रंजन चौधरी, टीआरएसकडून नम्मा नागेश्वर राव आणि के केशवा राव, सीपीआयएमकडून ई करीम, शिवसेनेकडून विनय राऊत आणि संजय राऊत तसंच राष्ट्रवादीकडून शरद पवार पंतप्रधान मोदींशी चर्चा करणार आहेत.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानमध्ये दिसणार भारतीय मालिका, चित्रपट

News Desk

लग्नासाठी पैसे दिले नाही म्हणून वडीलांचा खून

News Desk

२६ जूनचा ‘चक्का जाम’ ताकदीनिशी यशस्वी करा ! पंकजा मुंडेंचे ऑनलाईन बैठकीत आवाहन

News Desk