HW News Marathi
Covid-19

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने जनतेला पत्र

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दुसऱ्या सत्रातील कार्यकाळाला आज (३० मे) एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर मोदींनी जनतेला पत्र लिहिले असून या पत्राद्वारे मोदींनी वर्षभरात विविध कामांची आणि महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली. यात सर्जिकल स्ट्राईक, राम मंदिर बांधायला परवानगी असेल. एअर स्ट्राईक, कलम ३७० आणि तीन तलाक यांचा उल्लेख केला आहे.

याशिवाय स्थलांतरित मजुरांचे होणारे हाल यावर देखील त्यांनी पत्रात भाष्य केले आहे. स्थलांतरित मजुरांसाठी सरकारककडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नाविषयीदेखील त्यांनी पत्रात लिहिले आहे. याशिवय OROP, वन नेशन वन टॅक्स, जीएसटी सारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. देशात पहिल्यांदाच असंगठित क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर, छोटे दुकानदार आणि श्रमिकांना ६० वर्ष वयानंतर ३ हजार रुपये मासिक पेंशन देण्यचे आश्वासन दिले गेले आहे.

पीएम किसान सम्मान निधीचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होत आहे. या योजने अंतर्गत एका वर्षात ९ कोटी ५० लाख पेक्षाही जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ७२ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत १५ कोटींपेक्षा अधिक घरांमध्ये पाईप कनेक्शनद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

तसेच मोदींनी पत्रात कोरोनासंदर्भात लिहिता म्हटले, भारतात कोरोना शिरकाव झाला. भारत संपूर्ण जगासाठी संकंट बनेल. मात्र, आज आपण जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. टाळ्या-थाळी वाजवण्यापासून ते भारतीय सैन्याद्वारे पुष्पवृष्टीकरुन कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला गेला. तुम्ही लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन केले. याशिवाय प्रवासी मजुरांच्या समस्यांचेदेखील निराकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात कडक निर्बंध लावा मात्र लॉकडाऊन नको, पुणे व्यापारी संघाची पालकमंत्र्यांकडे मागणी!

News Desk

जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा ५० लाखांच्या जवळ

News Desk

उद्यापर्यंत निर्णय झाला नाही तर दुकाने सुरु करणारच ! कोल्हापूरमध्ये व्यापाऱ्यांचा निर्वाणीचा इशारा

News Desk