HW News Marathi
Covid-19

केंद्रीय आरोग्यमंत्री महाराष्ट्राच्या परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा

नवी दिल्ली | देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. देशातील महाराष्ट्रात कोरोनाबाधिकांची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, यावर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धव यांनी चिंता व्यक्त केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर यावर डॉ. हर्षवर्धव यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्यात राज्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातील. यासंदर्भात चर्चा झाली असून मुंबई, पुणे आणि नागपूर हे कोरोना रुग्णांचे हॉटस्पॉट बनले आहे. त्यापाठोपाठ राज्यातील ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची काल (५ मे) एकूण संख्या १५ हजार ५२५ झाली. तर काल ८४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून राज्यात काल ३५४ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २८१९ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काहींनी ५ वर्षात कारखान्यावर २५० कोटी कर्ज करून ठेवले ! धनंजय मुंडेंचा टोला

News Desk

‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात न आल्यास लॉकडाऊनचा विचार करावा लागेल – अजित पवार

News Desk

‘पुण्याच्या महापौरांचा मान पहिला, अशी चूक पुन्हा होणार नाही’, अजित पवारांचं विधान

News Desk