HW News Marathi
Covid-19

पंतप्रधान फक्त ४ तासच झोपतात, मुख्यमंत्र्यांनी किमान तेवढा वेळ तरी काम करावे

मुंबई । “पंतप्रधान फक्त ४ तासच झोपतात, मुख्यमंत्र्यांनी किमान तेवढा वेळ तरी काम करावे”, असे म्हणत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. शिवसेना खासदार “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची काम करण्याची पद्धत सारखीच आहे. ते एका जागेवरून यंत्रणेवर लक्ष ठेवतात”, असे विधान संजय राऊत यांनी केले होते. मात्र, त्यांच्या याच विधानाला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. “मुख्यमंत्री मातोश्री बाहेर पडत नाहीत”, अशी टीका विरोधकांकडून होत आली आहे.

अतुल भातखळकर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “कार्यकारी उद्धवजींची तुलना ब्रह्मदेवाशीही करू शकतात. बाकी सत्य काय ते महाराष्ट्राच्या जनतेला ठाऊकच आहे. मात्र उद्धवजींना एकच विनंती की मोदीजी फक्त चार तास झोप घेतात, तेवढा वेळ तरी काम करा”, असे म्हणत भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांसह संजय राऊतांना देखील सुनावले आहे. “उद्धव ठाकरेंच्या कामाच्या पद्धतीवर टीका करणाऱ्यांनी आधी नरेंद्र मोदींनाही असे काम न करता संपूर्ण देश पालथा घालावा हे सांगण्याचे धाडस करावे”, असेही राऊत म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्र सरकारने महाराष्ट्राला म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शन वाटपामध्ये झुकतं माप द्यावं – राजेश टोपे

News Desk

१ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना लसीकरण सुरू होणार

News Desk

ऑक्सिजन टँकर रस्ता चुकला आणि ७ कोरोना रुग्णांचा झाला मृत्यू

News Desk