HW News Marathi
Covid-19

पंतप्रधान मोदींच्या आर्थिक पॅकेजचे पृथ्वीराज चव्हाणांनी केले स्वागत

मुंबई | कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. यामुळे देशातील अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे. या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (१२ मे) देशवासियांना संबोधित करताना भारताला आत्मनिर्भर बनवण्याकरता २० लाख कोटीच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. मोदींच्या या निर्णयाचे काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्वीट करत स्वागत केले आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले , “लाॅकडाऊन सुरु झाल्यापासून मी कायम मागणी करीत होतो कि, आपली अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी जी.डी.पी.च्या किमान १०% (२१ लाख कोटी रुपये) प्रोत्साहन पॅकेज दिले पाहीजे. प्रधानमंत्र्यांनी आज २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे ही समाधानाची बाब आहे. आता त्याचा योग्य विनियोग होईल ही अपेक्षा.”

यापूर्वी चव्हाण यांनी केंद्र सरकारकडे देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करावी, अशी मागणी केली होती. देशाच्या आर्थिक आकडेवारीनुसार पॅकेज वाढवून १० टक्केपर्यंत म्हणजे २१ लाख कोटींपर्यंत पॅकेज दिले पाहिजे अशी मागणी चव्हाण यांनी केली होती. आता केंद्र सरकारने देशासाठी २० लाख कोटींचे पॅकेज दिल्याने काँग्रेसचे इतर नेत्यांनी टीका केली असली तर मात्र, चव्हाण यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पुण्यात कोण तुमचं ऐकत नाही आणि तुम्ही महाराष्ट्राला धमकी देतात?”

News Desk

हिंगोली जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४६ वर

News Desk

अदानी शरद पवारांना जाऊन भेटले अन् …! राज ठाकरेंचा शरद पवारांवर गंभीर आरोप 

News Desk