HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात जरी आघाडीचं सरकार असलं तरी बाळासाहेब थोरातांना बळकट करायचे आहे, पृथ्वीराज चव्हाणांचे सुचक वक्तव्य

मुंबई | शिवसेनेत असलेल्या रणजितसिंह देशमुख यांनी आज पुन्हा कॉंग्रेसमध्ये घरवापसी केली. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत रणजितसिंह देशमुख यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले आहे. रणजित देशमुख यांच्यावर आमच्याकडून अन्याय झाला असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन स्वगृही परतलेले रणजितसिंह देशमुख यांचं त्यांनी स्वागत केलं आहे.रणजितसिंह हे अत्यंत तडफेने काम करणारे नेते आहेत.

आपण तीन पक्ष सत्तेत आहेत, त्यातून पक्ष बळकट करायचा आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे हात बळकट करायचे आहेत, असं सूचक विधान देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमधील अनेकांच्या भूवया उचावल्या आहेत.महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहोत. मात्र, त्यातूनही आपल्याला काँग्रेला बळकट करायचं आहे. काँग्रेसला बळकट करण्यासाठी बाळासाहेब थोरात यांचेही हात बळकट करायचे आहेत, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

बाळासाहेब थोरात यांनी यावेळी पृथ्वीराज चव्हाण देश पातळीवरील नेते आहेत, असं म्हटलं. आम्हाला राज्यात काँग्रेसला वाढवण्यासाठी त्यांच मार्गर्शन लागणार आहे, म्हणून साताऱ्यातील जबाबदारी तरुणांनी घेतली पाहिजे, अशी आशा थोरात यांनी व्यक्त केली.रणजित देशमुख यांनी सूतगिरणी यशस्वी केली, याच काय रहस्य आहे? हे त्यांना विचारावा लागेल. काँग्रेसला पुन्हा एकदा वैभव आणण्याचं काम आपलं आहे. थोड्या अडचणी आहेत पण आपल्याला मेहनत करायची आहे. आपण जनतेसाठी काम करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही मोठे व्हा पक्ष आपोआप मोठा होईल, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“असाच बदल बिहारच्या निवडणुकीतही दिसेल”, रोहित पवारांचा भाजपवर निशाणा

News Desk

प्रत्येक जिल्ह्यात ‘महिला विकास व्यासपीठ’ असावे! – डॉ.नीलम गोऱ्हे

Aprna

…म्हणूनच देशातील जुनी वाहने भंगारात काढणे गरजेचं असल्याची नितीन गडकरींची माहिती! 

News Desk